शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

मुंबईतून पाकिस्तानी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 05:38 IST

जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘इसिस’च्या सूत्रधारासह पाकिस्तानी हेर संस्था ‘आयएसआय’च्या तीन एजंटांच्या मुसक्या नुकत्याच आवळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईतील २६ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने तपास यंत्रणांची झोप उडाली असून या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ने सुरू केला आहे. तथापि, एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नसल्याने गूढ वाढले आहे. मुंबईत आयएसआयचे आणखी तीन एजंट लपलेले असल्याची शक्यता उत्तर प्रदेशातील एटीएसने वर्तवल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यावरून तपास सुरू केला असता जुहू परिसरातील या २६ पाकिस्तानी नागरिकांचा गेल्या दोन आठवड्यांपासून ठावठिकाणा लागत नसल्याचे आढळले. भारतातील कोणत्या शहरात कोणाच्या घरी वा हॉटेलमध्ये राहणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, याबाबतची स्पष्ट माहिती ‘सी फॉर्म’द्वारे देण्याचे बंधन भारतात येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आहे. ‘सी फॉर्म’च्या आधारे पाकिस्तानी नागरिकांचा शोध पोलिसांनी सुरू केला असता संबंधित पत्त्यावर ते सापडलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्यासारख्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयात अत्यंत हलगर्जीपणे ‘सी फॉर्म’ भरून घेण्याचा उपचार पार पाडण्यात आल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, सी फॉर्मवरील तपशीलाची नियमित खातरजमा करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याची गंभीरबाबही यातून समोर आली आहे. >‘सी फॉर्म’च्या आधारे शोध‘सी फॉर्म’च्या आधारे या पाकिस्तानी नागरिकांचा पत्ता मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्यांना शोधण्यात अपयश आले. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आणि तपास यंत्रणांनी आपल्या शोधमोहिमेची गती वाढवली. जुहूसह मुंबईतील अन्य परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि संशयित ठिकाणांची तपासणी करून पोलीस या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. >वरिष्ठांकडून प्रतिसाद नाहीते पाकिस्तानी नागरिक नाव बदलून राहत आहेत का? ते मुंबईतच आहेत की बाहेर? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, कायदा व सुव्यवस्थाचे सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीन वाढले आहे.>पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघनजम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफांचा जोरदार मारा केला. त्यात दोन नागरिक ठार झाले, तसेच तीन जण जखमी झाले.१0 मेपासून पाककडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही तिसरी घटना आहे. त्यात आता पर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ असलेल्या शाळा बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सरहद्दीवरील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.