शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुंबईतून पाकिस्तानी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 05:38 IST

जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘इसिस’च्या सूत्रधारासह पाकिस्तानी हेर संस्था ‘आयएसआय’च्या तीन एजंटांच्या मुसक्या नुकत्याच आवळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईतील २६ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने तपास यंत्रणांची झोप उडाली असून या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ने सुरू केला आहे. तथापि, एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नसल्याने गूढ वाढले आहे. मुंबईत आयएसआयचे आणखी तीन एजंट लपलेले असल्याची शक्यता उत्तर प्रदेशातील एटीएसने वर्तवल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यावरून तपास सुरू केला असता जुहू परिसरातील या २६ पाकिस्तानी नागरिकांचा गेल्या दोन आठवड्यांपासून ठावठिकाणा लागत नसल्याचे आढळले. भारतातील कोणत्या शहरात कोणाच्या घरी वा हॉटेलमध्ये राहणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, याबाबतची स्पष्ट माहिती ‘सी फॉर्म’द्वारे देण्याचे बंधन भारतात येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आहे. ‘सी फॉर्म’च्या आधारे पाकिस्तानी नागरिकांचा शोध पोलिसांनी सुरू केला असता संबंधित पत्त्यावर ते सापडलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्यासारख्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयात अत्यंत हलगर्जीपणे ‘सी फॉर्म’ भरून घेण्याचा उपचार पार पाडण्यात आल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, सी फॉर्मवरील तपशीलाची नियमित खातरजमा करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याची गंभीरबाबही यातून समोर आली आहे. >‘सी फॉर्म’च्या आधारे शोध‘सी फॉर्म’च्या आधारे या पाकिस्तानी नागरिकांचा पत्ता मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्यांना शोधण्यात अपयश आले. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आणि तपास यंत्रणांनी आपल्या शोधमोहिमेची गती वाढवली. जुहूसह मुंबईतील अन्य परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि संशयित ठिकाणांची तपासणी करून पोलीस या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. >वरिष्ठांकडून प्रतिसाद नाहीते पाकिस्तानी नागरिक नाव बदलून राहत आहेत का? ते मुंबईतच आहेत की बाहेर? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, कायदा व सुव्यवस्थाचे सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीन वाढले आहे.>पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघनजम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफांचा जोरदार मारा केला. त्यात दोन नागरिक ठार झाले, तसेच तीन जण जखमी झाले.१0 मेपासून पाककडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही तिसरी घटना आहे. त्यात आता पर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ असलेल्या शाळा बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सरहद्दीवरील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.