शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून पाकिस्तानी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 05:38 IST

जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘इसिस’च्या सूत्रधारासह पाकिस्तानी हेर संस्था ‘आयएसआय’च्या तीन एजंटांच्या मुसक्या नुकत्याच आवळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईतील २६ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने तपास यंत्रणांची झोप उडाली असून या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ने सुरू केला आहे. तथापि, एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नसल्याने गूढ वाढले आहे. मुंबईत आयएसआयचे आणखी तीन एजंट लपलेले असल्याची शक्यता उत्तर प्रदेशातील एटीएसने वर्तवल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यावरून तपास सुरू केला असता जुहू परिसरातील या २६ पाकिस्तानी नागरिकांचा गेल्या दोन आठवड्यांपासून ठावठिकाणा लागत नसल्याचे आढळले. भारतातील कोणत्या शहरात कोणाच्या घरी वा हॉटेलमध्ये राहणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, याबाबतची स्पष्ट माहिती ‘सी फॉर्म’द्वारे देण्याचे बंधन भारतात येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आहे. ‘सी फॉर्म’च्या आधारे पाकिस्तानी नागरिकांचा शोध पोलिसांनी सुरू केला असता संबंधित पत्त्यावर ते सापडलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्यासारख्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयात अत्यंत हलगर्जीपणे ‘सी फॉर्म’ भरून घेण्याचा उपचार पार पाडण्यात आल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, सी फॉर्मवरील तपशीलाची नियमित खातरजमा करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याची गंभीरबाबही यातून समोर आली आहे. >‘सी फॉर्म’च्या आधारे शोध‘सी फॉर्म’च्या आधारे या पाकिस्तानी नागरिकांचा पत्ता मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्यांना शोधण्यात अपयश आले. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आणि तपास यंत्रणांनी आपल्या शोधमोहिमेची गती वाढवली. जुहूसह मुंबईतील अन्य परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि संशयित ठिकाणांची तपासणी करून पोलीस या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. >वरिष्ठांकडून प्रतिसाद नाहीते पाकिस्तानी नागरिक नाव बदलून राहत आहेत का? ते मुंबईतच आहेत की बाहेर? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, कायदा व सुव्यवस्थाचे सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीन वाढले आहे.>पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघनजम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफांचा जोरदार मारा केला. त्यात दोन नागरिक ठार झाले, तसेच तीन जण जखमी झाले.१0 मेपासून पाककडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही तिसरी घटना आहे. त्यात आता पर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ असलेल्या शाळा बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सरहद्दीवरील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.