शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून पाकिस्तानी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 05:38 IST

जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘इसिस’च्या सूत्रधारासह पाकिस्तानी हेर संस्था ‘आयएसआय’च्या तीन एजंटांच्या मुसक्या नुकत्याच आवळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईतील २६ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने तपास यंत्रणांची झोप उडाली असून या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ने सुरू केला आहे. तथापि, एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नसल्याने गूढ वाढले आहे. मुंबईत आयएसआयचे आणखी तीन एजंट लपलेले असल्याची शक्यता उत्तर प्रदेशातील एटीएसने वर्तवल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यावरून तपास सुरू केला असता जुहू परिसरातील या २६ पाकिस्तानी नागरिकांचा गेल्या दोन आठवड्यांपासून ठावठिकाणा लागत नसल्याचे आढळले. भारतातील कोणत्या शहरात कोणाच्या घरी वा हॉटेलमध्ये राहणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, याबाबतची स्पष्ट माहिती ‘सी फॉर्म’द्वारे देण्याचे बंधन भारतात येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आहे. ‘सी फॉर्म’च्या आधारे पाकिस्तानी नागरिकांचा शोध पोलिसांनी सुरू केला असता संबंधित पत्त्यावर ते सापडलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्यासारख्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयात अत्यंत हलगर्जीपणे ‘सी फॉर्म’ भरून घेण्याचा उपचार पार पाडण्यात आल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, सी फॉर्मवरील तपशीलाची नियमित खातरजमा करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याची गंभीरबाबही यातून समोर आली आहे. >‘सी फॉर्म’च्या आधारे शोध‘सी फॉर्म’च्या आधारे या पाकिस्तानी नागरिकांचा पत्ता मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्यांना शोधण्यात अपयश आले. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आणि तपास यंत्रणांनी आपल्या शोधमोहिमेची गती वाढवली. जुहूसह मुंबईतील अन्य परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि संशयित ठिकाणांची तपासणी करून पोलीस या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. >वरिष्ठांकडून प्रतिसाद नाहीते पाकिस्तानी नागरिक नाव बदलून राहत आहेत का? ते मुंबईतच आहेत की बाहेर? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, कायदा व सुव्यवस्थाचे सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीन वाढले आहे.>पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघनजम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफांचा जोरदार मारा केला. त्यात दोन नागरिक ठार झाले, तसेच तीन जण जखमी झाले.१0 मेपासून पाककडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही तिसरी घटना आहे. त्यात आता पर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ असलेल्या शाळा बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सरहद्दीवरील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.