शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

‘सैराट’ जोडीचे पोलिसांनी लावले लग्न

By admin | Updated: June 30, 2016 20:56 IST

आयुष्यभराची साथ निभविण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘सैराट’ जोडीला पोलिसांनी कायद्याने मदतीचा हात दिला. सैन्य दलातील जवान अन महाविद्यालयीन युवतीचे प्रेम पोलिसांच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले

सुनील चौरे

हदगाव, दि. ३०  : समजून... उमजून... आयुष्यभराची साथ निभविण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘सैराट’ जोडीला पोलिसांनी कायद्याने मदतीचा हात दिला. सैन्य दलातील जवान अन् महाविद्यालयीन युवतीचे प्रेम पोलिसांच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. शेवटी कुटुंबियांचे मन परिवर्तन करीत पोलिसांनी हा अनोखा विवाह सोहळा ठाण्यातच घडवून आणला.हदगाव शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात पोलिसांनीच आंतरपाठ धरला. शेवंतीही आणली. शेवट गोड झालेल्या सैराट जोडीच्या कहाणीला २७ जून रोजी कलाटणी मिळाली होती. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरला ढगफुटी झाली. त्याच दिवशी एका कुटुंबातील महाविद्यालयीन युवती घरातून निघून गेली होती. काकाकडे शिक्षणासाठी राहत असलेली पूजा शेजारी राहणाऱ्या शंकरची मनोमन पूजा करीत होती. गांभीर्यपूर्वक एकमेकांना आयुष्याचा साथी करण्याचा विवेकी निर्णय जोडीने घेतला. दरम्यान शंकर सैन्य दलात दाखल झाला होता. परंतु दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलगी सज्ञान असली तरी तिचे शिक्षण सुरु असल्याने घरच्यांकडून संमती मिळालेली नव्हती. शेवटी तीन दिवसापासून सैराट झालेली ही जोडी हदगावच्या पोलिस ठाण्यात हजर झाली. दोघांनीही पोलिस निरीक्षक एस.एस. आमले यांना आपली कथा सांगितली. कायद्याने दोघेही सज्ञान. विचाराने पक्के. आयुष्यभराची साथ निभविण्याची तयारी अन् गांभीर्याने सैराट झालेले मन पोलिसांनाही भावले. त्यांनी मुला-मुलीच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना बोलविले. त्यांची समजूत घातली. मराठा सेवा संघाचे पाटील आम्रते, गणेश बलदेवा, सुनीलभाऊ सोनुले, दत्तरामजी सुकळकर, गजानन पाटील यांनीही नातेवाईकांचे मन परिवर्तन केले. बघता-बघता पोलिस ठाण्याला मंगल कार्यालयाचे रुप आले. कार्यकर्ते, पत्रकार, नगरसेवक अशी वऱ्हाडी मंडळी जमली. पोलिस निरीक्षक आमले व गजानन पाटील यांनी वधु-वरांचे कपडे घेतले. सर्व काही रितिरिवाजाने पार पाडले. ज्येष्ठांनी आशिर्वाद दिले.