शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

... ३५ पानांमध्ये लिहून ठेवली सुनेच्या त्रासाची व्यथा

By admin | Updated: July 27, 2016 21:55 IST

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केली असून सुनेसह तिच्या आई, वडिलांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तब्बल ३५ पानांमध्ये आपली व्यथा मृतकाने लिहून ठेवली आहे.

ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. २७ : सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केली असून सुनेसह तिच्या आई, वडिलांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तब्बल ३५ पानांमध्ये आपली व्यथा मृतकाने लिहून ठेवली आहे. याप्रकरणात मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक तायडे कॉलनी भागात रहिवाशी असलेले साहेबराव बळीराम आंबिलडिगे (६२) हे विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा लहान मुलगा संदीप आंबिलडिगे याचे २०१५ साली वडाळी ता. नांदुरा येथील पुंडलिक सरदार यांची मुलगी पुनम हिचेशी लग्न झाले. संदीप बुलडाणा येथे आयडीबीआय बँकेत नोकरीला आहे. त्यामुळ मुलगा व सुन बुलडाणा येथे भाड्याने राहत आहे. दरम्यान लग्नानंतर मुलगा व सुनेमध्ये नेहमी खटके उडत होते. याबाबत संदीपने वेळोवेळी वडिलांना माहिती दिली. घरच्यांनी सून पुनम व तिचे आई, वडिल तसेच काकांना होत असलेल्या वादाबाबत माहिती दिली. मात्र त्यांनी समजावून न सांगता उलटपक्षी मुलीला चांगले वागवा अन्यथा तुमच्या विरोधात पोलिसात तक्रारी देवू अशा धमक्या २८ आॅक्टोबर २०१५ रोजी दिल्या.

यानंतरही वेळोवेळी वाद होत असल्याने सुनेला समजावण्याचा प्रयत्न केला असता ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ५ जुलै २०१६ रोजी पुनमचे वडिल पुंडलिक सरदार, चुलतभाऊ दौलत सरदार यांनी पुन्हा तक्रारी देण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे साहेबराव आंबिलडिगे यांनी व्यथीत होवून १७ जुलै रोजी आवार येथील शेतामध्ये विष प्राशन केले. त्यांना तात्काळ स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. दहा दिवसानंतर (बुधवारी) त्यांचा मृत्यू झाला.

वडिलांना सून पुनम, तिचे वडिल पुंडलिक सरदार, तिची आई, काका दौलत सरदार यांनी सतत मानसिक छळ करुन व धमक्या देवून आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार मृतक यांचा मोठा मुलगा प्रदीप आंबिलडिगे यांनी ग्रामीण पोलिस स्टेश्नला दिली. या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त चारही आरोपीविरुध्द कलम ३०६, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सचिंद्र शिंदे करीत आहेत. पोलिस तक्रारीनंतर अंत्यसंस्कारसाहेबराव आंबिलडिगे यांचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. कोणत्याही परिस्थितीत वडिलांना त्रास दिलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हायला पाहिजे. ही भूमिका आंबिलडिगे कुटुंबाने घेतली. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करायला सुरुवात केल्यानंतरच साहेबराव आंबिलडिगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.