शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

‘झीरो बजेट’ शेतीला ‘पद्मश्री’चे कोंदण!

By admin | Updated: January 26, 2016 03:14 IST

झीरो बजेट अर्थात नैसर्गिक शेतीचे प्रणेते असणारे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील शेतकरी सुभाष पाळेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे

योगेश बिडवई,मुंबईझीरो बजेट अर्थात नैसर्गिक शेतीचे प्रणेते असणारे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील शेतकरी सुभाष पाळेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पाळेकर यांना पुरस्कार देऊन केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या विरोधातील विषमुक्त कृषी चळवळीचा गौरव केल्याचे मानले जात आहे. रासायनिक खतांमुळे शेतीवर वाढलेला खर्च व नापिकीमुळे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडत असताना पाळेकर यांनी मात्र कमी खर्चात शेती करण्याचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे तारणहार ठरले आहेत. कृषी पदवीधर (बी. एससी. अ‍ॅग्रीकल्चर) असलेल्या पाळेकर यांनी राज्यातील हजारो शेतकऱ्यांना निशुल्क नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. ते महिन्यातील २५ दिवस शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बाहेर असतात. २५ वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रम आहे. एक दिवसापासून ते आठवडाभराचे प्रशिक्षण शिबीर ते घेतात. १९४९ मध्ये जन्मलेल्या पाळेकर यांच्यावर विनोबा भावेंचा मोठा प्रभाव आहे. विनोबांच्या सहवासात आल्यानंतर ते निसर्गाकडे अधिक ओढले गेले. कृषी पदवी घेतल्यानंतर पाळेकर हे त्यांच्या ४० एकर शेतीत रासायनिक खतांचा वापर करून अधिक उत्पन्न घेऊ लागले. १९७३ पासून सुरू झालेल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे १९८५ नंतर मात्र त्यांच्या शेतातील उत्पन्न घटले, त्यातून ते जागे झाले आणि नैसर्गिक शेतीकडे वळले. त्यांनी गौंड आदिवासींच्या शेतीचा अभ्यास केला, त्यातून त्यांना निसर्ग समजला. त्यानंतर ते देशी गाईचे शेण व गोमूत्र यांचा वापर करून शेती करू लागले. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. स्वअनुभवातून त्यांनी नंतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करणे सुरू केले. पाळकेरांना पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे ६ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ते शिबिरात होते. या शिबिरात आंध्रचे उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, दोन हजार कृषी अधिकारीसुद्धा सहभागी झाले आहेत. पाच दिवस हे शिबीर चालणार आहेत. त्याला मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांनी कर्नाटक, तामिळनाडू, केरळ येथेही शिबिरे घेतली आहेत. राज्य सरकारकडून उपेक्षाआंध्र प्रदेश सरकारनेही त्यांचे शिबीर आयोजित केले असताना महाराष्ट्र सरकारकडून मात्र त्यांची उपेक्षा झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनीही त्यांच्या चळवळीला कायम विरोध केला. कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली नाही. कर्नाटकचा पुरस्कारकर्नाटक राज्यात पाळेकर यांच्या कामाची दखल घेण्यात आली. २००५ मध्ये त्यांना चित्रदुर्गस्थित मठाकडून बसवश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००६ मध्ये त्यांना कर्नाटक राज्य रयत संघातर्फे भारत कृषक रत्न सन्मान देण्यात आला.