शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

भात संशोधनाची पताका सातासमुद्रापार

By admin | Updated: September 18, 2015 23:14 IST

रत्नागिरी भाताचा वाण : रत्नागिरी १ दक्षिण आफ्रिकेत १९९०पासून

खेर्डी : भातावर संशोधन करण्यात शिरगाव-रत्नागिरी येथील कृषी संशोधन केंद्राने राज्य, राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संशोधनाची पताका फडकवली आहे. रत्नागिरी हा भाताचा वाण लॅटीन अमेरिका, कॅरिबियन आयर्लंड येथील पॅराग्वे परगण्यात सीईए ३ या नावाने २५ वर्षांपासून आपल्या उत्पादनाची कमाल दाखवत आहे. तर रत्नागिरी १ हे वाण दक्षिण आफ्रिकेतील झांबिया प्रांतात सन १९९०पासून सर्वदूर दिसत आहे. भातावर संशोधन करण्यासाठी देशात कोईम्बतूर नंतर स्थापन झालेल्या शिरगाव कृषी संशोधन केंद्राने भातपिकामधील संशोधन, बीजोत्पादन, तंत्रज्ञान विकास व विस्ताराच्या कार्याचा मोठा टप्पा पार केला आहे. १३ भात जातींचे संशोधन तसेच पश्चिम महाराष्ट्रापेक्षा १०० टक्के जास्त उत्पादन देणाऱ्या भुईमुगाच्या शोधन कार्यातून शेतीतील दूरगामी व आमूलाग्र बदल घडविण्यात क्रांतीकारी संशोधन इथे झाले आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेलं कृषी संशोधन केंद्र शिरगाव हे भातावर संशोधन करणारं एक प्रमुख केंद्र ठरलं आहे. सन १९६० ते आजतागायत इथे चित्तवेधक काम झालं. हरितक्रांतीनंतर संकरीत जातीच्या बि-बियाणांची निर्मिती इथे झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर तर कोकणात ४५०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती होत असल्याची कागदोपत्री आकडेवारी आहे. गेल्या दशकभरात भातपिकाखालील क्षेत्र घटत चालले असले तरी उत्पादकतेवर त्याचा परिणाम झालेला नाही. सन १९७१मध्ये झिनिया ६३ व ताईचुंग नेटीव १ या बारीक दाण्याच्या जाती संकरातून रत्नागिरी २४ ही अतिबारीक व उत्तम दाण्याचा प्रकार असलेली जात विकसित करण्यात आली. त्यानंतर विविध कालावधीत वेगवेगळे दाणे आणि विभागानुसार भाताच्या ९ सुधारित जाती इथे विकसित झाल्या. भातामध्ये १७ नर व मादी वाण शोधून काढून ११ लाईन्सची नोंदणी नवी दिल्ली येथे करण्यात आली. भाताच्या ३ अतिशय उत्कृष्ट जातींचा म्हणजे रत्नागिरी १, २४ व ७११ कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. लवकर परिपक्व होणे, अधिक उत्पादन स्थिरता, किडी व रोगांना चांगला प्रतिकार करणे, उत्कृष्ट तांदूळ व दाण्याचा उतारा तसेच शिजण्यास उत्तम अशा गुणवैशिष्ठ्यांमुळे हे वाण लोकप्रिय आहे. (वार्ताहर)कृषी संशोधन केंद्र, शिरगाव येथे भातावर संशोधन.कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रसार.उत्कृष्ट तांदूळ व दाण्याचा उतारा तसेच शिजण्यास उत्तम.लॅटीन अमेरिकेतही भाताचे वाण.