शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मेहनत, वेळेचे नियोजन करून फायदेशीर भातशेती

By admin | Updated: July 13, 2017 03:33 IST

भातशेतीच्या पिकापेक्षा मजुरीवर खर्च अधिक होतो.

सिकंदर अनवारे । लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : भातशेतीच्या पिकापेक्षा मजुरीवर खर्च अधिक होतो. उत्पन्न, खर्च आणि मेहनत याचा ताळमेळ जुळत नाही. अशी अनेक कारणे पुढे करत कोकणातील शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. वेळेचे नियोजन आणि अंगमेहनत यांचा ताळमेळ साधला तर शेती फायदेशीर ठरू शकते हे महाड तालुक्यातील गोंडाले गावातील समीर तळेकर या तरुण शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. गेली पाच ते सात वर्षे समीर आणि त्याचे वडील आपला व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत तीन खंडी भाताची शेती करीत आहेत. कोकणामध्ये छोट्या छोट्या तुकड्यामध्ये भात शेती केली जाते. निसर्गाच्या लहरीपणावर ही भात शेती अवलंबून असून, मजुरीचा दर वाढल्याने शेतीमधील फायदा कमी झाला आहे. नांगरणी, लावणी, कापणी आणि झोडणी या चार भात शेतीमधल्या मोठ्या आणि अंगमेहनतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असून गरजेप्रमाणे मजूर मिळत नसल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे शेती करत असताना शेतीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येतो तर कोणतेही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तरी शेतीतून मिळणाऱ्या नफ्यात मोठा फरक पडत नाही. त्यातच निसर्गाने फटका दिल्यास हाता-तोंडाशी आलेले भात पीक जमीनदोस्त होण्याची भीती असल्याने शेतकरी भातशेतीपासून दूर चालला आहे. घरामध्ये आई-वडील, मुलगा आणि सून असे चौघांचेच कुटुंब असणाऱ्या समीर तळेकर या तरुण शेतकऱ्याने वेळेचे आणि श्रमाचे नियोजन करून शेती करून दाखवली आहे.महाड शहरापासून दोन ते तीन किमी अंतरावरती गोंडाळे हे छोटेसे गाव आहे. या गावातील झांझे कोंड येथे समीर तळेकर हा तरुण शेतकरी राहतो. महाडमध्ये खासगी शाळेत स्कूल व्हॅनद्वारे मुलांची वाहतूक करणे, रिक्षा चालविणे हा त्याचा पूर्णवेळ व्यवसाय असून त्याचे वडील सुरेश तळेकर हे गोंडाळे गावचे पोस्टमन आहेत. आपले नियमित काम करून तळेकर पिता-पुत्र फायद्याची शेती करतात. नांगरणीवरचा खर्च कमीभात शेती करताना किमान वेगवेगळ्या कामासाठी चार वेळा शेतामध्ये नांगर फिरवला जातो. स्वत:चा नांगर आणि बैलजोडी असली तरी नांगराचा एवढा वापर शेतकऱ्याला परवडणारा नसतो. या अनावश्यक खर्चाचा विचार करून केवळ एकदाच नांगरणी करून तळेकर कुटुंबीय भात शेती करत आहे. सुरुवातीला एकदाच शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जाते. नंतर चांगल्या पावसाने शेतात अपेक्षित चिखल झाल्यानंतर थेट लावणीचे काम सुरू केले जाते. लावणी करताना पुन्हा शेतात नांगर न फिरवता गरज भासेल तिथे कुदळीने जमीन नरम करत भात शेतीची लावणी केली जाते. पारंपरिक पद्धतीपेक्षाही थोडी वेगळी पद्धत असली तरी यामुळे भात शेतीच्या उत्पन्नात घट होत नसून उलट मेहनत, वेळ, पैसा या तिन्ही गोष्टी वाचल्या आहेत.भात कापणीनंतर मटकीची शेतीभात शेती करत असताना मेहनत आणि वेळेची काटकसर करत ओल्या जमिनीत मटकीचे बियाणे टाकून केवळ खुरपणी आणि झोडणी ही दोनच कामे करून हे कुटुंब मटकीचे पीक देखील चांगल्या प्रकारे घेत आहेत. मटकीला चांगला दर आणि मागणी मिळते तर कमी देखभालीमध्ये पीक चांगले येते. याचा फायदेशीर विचार या ठिकाणी कुटुंबीयांनी केला आहे. वर्षाकाठी ५० किलोपर्यंत मटकीचे उत्पन्न तळेकर कुटुंबीय घेत आहे.शेतीसाठी शेणखताचा वापरचांगले पीक येण्यासाठी जवळजवळ सर्वच शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. शासन सेंद्रिय खतांचा आग्रह करीत असले तरी याबाबत शेतकऱ्यांमध्ये म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. तळेकर कुटुंबीय आपली ही शेती करत असताना रासायनिक खतांऐवजी शेणखताचा वापर करीत शेती करीत आहे. मटकीची शेती झाल्यानंतर उरलेली गुली ज्या शेतकऱ्याला ते देतात त्याच्याकडून पैशाऐवजी शेण तळेकर घेतात आणि या शेणाचा शेतात वापर शेणखत म्हणून केला जातो.मजुराशिवाय पिता-पुत्राने के ले कामतळेकर पिता-पुत्राचे काम सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होते, ते तर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुटी होते. हे पिता-पुत्र संध्याकाळच्या वेळेचे नियोजन करत रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत शेतात मेहनत करतात. तरवा भाजणीपासून ते भात झोडणीपर्यंतची सर्व कामे ते संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत करतात. या सर्व कामासाठी एकही विकतचा मजूर ते घेत नाहीत. कामाचे दिवस वाढत असतानाच अंगमेहनत देखील वाचते, मात्र मजुरीवरील खर्च कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत आणि मजुरांच्या नियोजनासाठी त्याच्या मागे फिरतात. वाया जाणारा वेळ ते वाचवतात. मजूर न लावता हे पिता-पुत्र परिश्रम घेत असल्याने मजुरांवर होणाऱ्या मोठ्या खचाची यामुळे बचत होते. तसेच रसायनविरहीत शेती करत असल्यामुळे खत आणि किडनाशकांवरील खर्चाची बचत होती. के वळ शेणखताचा उपयोग के ल्याने जमिनीचे देखिल नुकसान न होता आरोग्यासाठी चांगले अन्नधान्या हे पीता-पुत्र पीकवत आहेत. अनेक खर्चांना फाटा देत असल्याने त्यांची शेती फायद्यात आहे.>सर्वच शेतकरी मजुरांची कमतरता आणि शेतीतून मिळणारा कमी नफा याची ओरड करतात तर अनेक शेतकरी शेतीच्या कामासाठी महिनाभरासाठी आपल्या कामावर सुट्या टाकतात. या खर्चीकपणातून मार्ग काढण्यासाठी शेती करण्याचा हा मार्ग आम्ही अवलंबला आहे. शेती करत असताना आपली रोजची कामे कुठेही खंडित न करता रिकाम्या वेळेचे नियोजन करून आम्ही शेती करतो हे करत असताना अंगमेहनत होत असली तरी शेतीचे उत्पन्न आणि फायदा वाढत आहे. त्यामुळे अंगमेहनतीचा त्रास होत नाही तर शेती करण्यासाठी जोम अगर प्रोत्साहन मिळते. - समीर तळेकर, तरुण शेतकरी, गोंडाळे