शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

गूळ उत्पादकच होणार आता ‘मालक’

By admin | Updated: May 16, 2017 01:27 IST

बाजार समिती : ‘पणन’च्या नवीन कायद्याचा परिणाम; सुमारे तीस हजार गूळ उत्पादक

राजाराम लोंढे ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सात-बारा नावावर असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बाजार समित्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा पणन विभागाने आणला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीबरोबर तो समितीला शेतीमालाचा पुरवठाधारक असणे बंधनकारक आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न समितीत सुमारे तीस हजार गूळ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या असल्याने आगामी निवडणुकीनंतर येथे गूळ उत्पादकच मालक होणार हे मात्र निश्चित आहे. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून बाजार समित्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात बहुतांशी बाजार समित्या असल्याने हा अंकुश ठेवला, हा राजकीय अर्थ बाजूला ठेवल्यास या सरकारने काही निर्णय चांगले घेतले आहेत. अडतीमधून शेतकऱ्यांना मुक्त केलेच, पण त्याबरोबर भाजीपाला, फळे नियमनमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय पणन विभागाने घेतल्याने समित्यांमधील शोषणाला बऱ्यापैकी लगाम लागल्याचे चित्र राज्यात पाहावयास मिळत आहे. विकास संस्थांवर ज्यांचे प्रभूत्व, त्यांचीच बाजार समितीवर सत्ता येते. विकास संस्थांचे संचालकच समितीचे कारभारी होतात. याऐवजी शेतीमाल उत्पादकांना मतदानाचा अधिकार द्यायचा म्हणजे शेतकऱ्यांची नेमकी दुखणे त्यांना कळतील. यासाठी पणन विभागाने सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे; पण सात-बारा नावावर असून चालणार नाही, तर त्या शेतकऱ्याने समितीला उत्पादित केलेला शेतीमाल पुरविला पाहिजे. सध्या कोल्हापूर बाजार समितीमधील मालाची आवक पाहता, गूळ मोठ्या प्रमाणात आवक होते, भाजीपाल्याची आवक फार कमी होते, दोन हजार शेतकरी भाजीपाला पुरवठा करतात. त्यामुळे नवीन कायद्यानुसार निवडणूक घ्यायची म्हटले तर गूळ उत्पादक शेतकरीच कारभारी होणार आहेत.ग्रामपंचायत गटही जाणारगेली अनेक वर्षे बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर ग्रामपंचायत सदस्यांमधून चार प्रतिनिधी निवडून येत होते. वास्तविक या गटाचा समित्यांच्या कारभाराशी थेट संबंध नसतानाही त्यांचे वर्चस्व राहिले; पण नवीन कायद्यानुसार या गटाबरोबरच पणन प्रक्रिया संस्था गट जाणार असून, या जागा उत्पादक शेतकरी गटात समाविष्ट केल्या जाणार आहेत.बोगस नोंदीची पळवाट !शेतीमाल उत्पादित न करता परजिल्ह्यांतून येणारा भाजीपाला नावावर नोंद करून निवडणुकीसाठी पात्र होण्याची पळवाट आहे. त्याचा वापर मोठ्या प्रमाणातही होऊ शकते, याला पणन विभाग कसा लगाम लावतो, त्यावरच नवीन कायद्याचे फलित अवलंबून आहे. कायद्यातील बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. शेतात राबणारा खरा शेतकरी संचालक मंडळात गेल्याने शेतीमालाच्या दराचे बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागू शकतात. - सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी) सध्याचे संचालक मंडळ विकास संस्था-११ पैकी ७ सर्वसाधारण, २ महिला, १ इतर मागासवर्गीय, १ भटक्या विमुक्त जाती/जमाती.ग्रामपंचायत-४ पैकी २ सर्वसाधारण, १ अनुसूचित जाती/जमाती, १ आर्थिकदृष्ट्या दुर्बल. व्यापारी प्रतिनिधी-२हमाल-तोलाईदार प्रतिनिधी-१पणन प्रक्रिया प्रतिनिधी-१