शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

प्रवासी सुरक्षा सायडिंगला

By admin | Updated: August 25, 2014 03:36 IST

मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे या दोघांच्या सीमांसंदर्भात कोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच असणाऱ्या समस्यांवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कधीही गांभीर्याने विचार केला नाही.

जयंत धुळप, अलिबागमध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे या दोघांच्या सीमांसंदर्भात कोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच असणाऱ्या समस्यांवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कधीही गांभीर्याने विचार केला नाही. कोकण रेल्वे पोलीस दल आणि कोकण रेल्वे आपत्ती नियंत्रण यंत्रणा अस्तित्वातच आली नसल्याने गेल्या तब्बल ११ वर्षांच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर तीन गंभीर अपघात झाले होते. रेल्वे अपघातात एकूण ९० प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत, तर ४००च्या वर प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कोकणातील जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासनांकडून ‘जिल्हा आपत्ती निवारण आराखडा’ तयार करण्याच्या प्रक्रियेकरिता सातत्याने बोलावून देखील ते कधीही येत नाहीत व सहकार्य देखील करीत नाहीत, ज्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रेल्वे अपघात आपत्ती नियंत्रण योजना देखील कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून अस्तित्वात येऊ शकलेली नाही. मुळात मध्य आणि कोकण रेल्वे हद्दीबाबत मोठा वाद आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने सातत्याने प्रवासी सुरक्षा साइड ट्रॅकला पडत असल्याचे दिसून येते.