शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परदेश वाऱ्यांची हद्द झाली

By admin | Updated: April 10, 2015 04:04 IST

सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश वाऱ्यांचा सपाटा लावला आहे. परदेश वाऱ्या करायच्या किती? याला तारतम्य नाही.

सोलापूर : सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश वाऱ्यांचा सपाटा लावला आहे. परदेश वाऱ्या करायच्या किती? याला तारतम्य नाही. १० वर्षांत आघाडी सरकारच्या पंतप्रधानांनी केल्या नाहीत तेवढ्या परदेश वाऱ्या अवघ्या १० महिन्यांत मोदींनी केल्या. यातून काय साध्य झाले, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी उपस्थित केला. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची गुरुवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ या वेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करीत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. अच्छे दिन येण्याची स्वप्नं सामान्य माणूस पाहतोय. मात्र, सध्या केंद्र सरकारचे धोरण पाहता सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. नरसिंहरावांच्या काळात आर्थिक पुनरुज्जीवनाचा पाया घातला गेला. डॉ. मनमोहन सिंगांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट केली. काँग्रेसच्या धोरणांमुळेच देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. आता विकासाला पैसा नसल्याची ओरड होत आहे. कुठे गेला हा पैसा, असा सवाल करीत शिंदे यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले. अणुकराराला विरोध करणाऱ्यांनीच अमेरिकन अध्यक्षांच्या समवेत त्याच करारावर थाटात सह्या केल्या, अशी खिल्ली त्यांनी उडवली. (प्रतिनिधी)