शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

उद्योगांमधील अस्वस्थता घालवण्यासाठी गांधींच्या विचारांकडे वळावे लागेल

By admin | Updated: April 19, 2017 03:04 IST

व्यावसायिक आणि समाज या दोन्ही घटकांना समाधानी राहायचे असेल तर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी मालकाची नव्हे तर विश्वस्ताची भूमिका स्वीकारायला हवी

मुंबई : व्यावसायिक आणि समाज या दोन्ही घटकांना समाधानी राहायचे असेल तर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी मालकाची नव्हे तर विश्वस्ताची भूमिका स्वीकारायला हवी, अशी भूमिका राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडली होती. उद्योग जगतातील अस्वस्थता घालवायची असेल तर महात्मा गांधींच्या याच विचारांकडे वळावे लागेल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी केले. कॉन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी)च्या २९ व्या जमनालाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार वितरण सभारंभात ते बोलत होते. चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या वालचंद हिराचंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रंमाला राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, बजाजचे शेखर बजाज, सीएफबीपीच्या अध्यक्षा कल्पना मुन्शी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभू म्हणाले की, जमनालाल बजाज यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे भाग्याचे आहे. हा पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांची जबाबदारी वाढली आहे. सध्या एखादी वस्तू स्वत:कडे नसल्याचे नागरिकांना दु:ख नसते तर ती वस्तू इतरांकडे आहे हे पाहून माणूस दु:खी होत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. तरच समाज सुखी व समाधानी होऊ शकेल. त्यासाठी सचोटीने आणि विश्वस्त भावनेने उद्योग करण्याचा मंत्र महात्मा गांधींनी दिला होता. त्याचेच अनुसरण करण्याची आवश्यकता आहे.निर्मिती, सेवा उद्योग, व्यापार, धमार्दाय संस्था यांच्या सुयोग्य कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्कार दिला जातो. ग्राहकांचे समाधान, ग्राहकांशी संवाद, कर्मचा-यांना प्रोत्साहन, पुरवठा श्रृंखला यंत्रणा, पर्यावरणीय संरक्षण, सामाजिक जबाबदारी अशा विविध बाबींचा विजेते निवडताना विचार केला जातो, असे निवड समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी सांगितले. (प्रतिनिधी )