शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

‘ओव्हर एज’ पोलीसही परीक्षेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 04:08 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी बसलेल्या ‘ओव्हर एज’(वाढीव वय) उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे

जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी बसलेल्या ‘ओव्हर एज’(वाढीव वय) उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. आता हे उमेदवार देखील आयपीएस परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे (मॅट) न्यायिक सदस्य बी. पी. मलिक यांनी बुधवारी पात्र ठरवत अंतरिम निकाल दिला. त्यामुळे पोलीस दलातील दोन हजारांवर इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीतर्फे येत्या २१ आॅगस्टला ही परीक्षा होणार आहे. उपनिरीक्षकांच्या ८२८ पदांसाठी मुंबईसह राज्यातील सात केंद्रावर परीक्षा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून सुमारे २५ हजारांवर अर्ज आल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्यापैकी दीड हजारांहून आधिक उमेदवारांचे वय हे आयोगाने निश्चित केलेल्या मर्यादेहून अधिक आहे. २०१३ व २०१४ या वर्षात ‘डिपार्टमेंटल’ परीक्षाच न झाल्याने त्यांना परीक्षेला बसण्याची संधी दिली पाहिजे, असे मलिक यांनी निकालात स्पष्ट केले आहे. त्यासाठी पाच उमेदवारांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. आता खुल्या प्रवर्गातील ३८ व मागासवर्गीय प्रवर्गातील ४३ वर्षांपर्यंतचे वयाचे उमेदवार परीक्षा देऊ शकतील.कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची अधिकारी बनण्याची इच्छा असते. त्यासाठी २५ टक्के पदे खात्यांतर्गत एमपीएससी मार्फत परीक्षा घेऊन भरली जातात. त्यासाठी पदवीधर कॉन्स्टेबल पदासाठी ४ वर्षे सेवा व बारावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी ५ वर्षे सेवा पूर्ण असणे ही प्रमुख अट आहे. त्याचप्रमाणे वय ३५ वर्षांच्या आत असणे गरजेचे असते. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत देण्यात येते. मात्र दरवर्षी परीक्षा होणे अपेक्षित असताना आयोगाने २०१३ व २०१४ या वर्षांत परीक्षाच घेतलेली नव्हती. त्यामुळे इच्छुकांना वयाबाबत शिथिलता द्यावी, अशी मागणी होती. ‘मॅट’ने ती ग्राह्य धरुन अंतरिम निकाल दिला आहे. कोणीही इच्छुक वयाच्या कारणामुळे डावलला जाऊ नये, याबाबत आयोगाने दक्षता घ्यावी, अशी सूचना मलिक यांनी केली आहे. आॅनलाइन अर्ज आणि असंतोष...एमपीएससीने या परीक्षेसाठी २६ जूनला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सुरुवातीला ‘ओव्हर एज’ उमेदवारांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांतून असंतोष व्यक्त होवू लागल्यानंतर आयोगाने त्यांचा अ‍ॅक्सेस सुरु केला.संबंधित उमेदवारांनी कितीवेळा परीक्षा दिल्या आहेत, हे नमूद करण्यासाठी स्वतंत्र रकाना बनविण्यात आला. पूर्वीच्या नियमाप्रमाणे खुल्या गटातील उमेदवार ३५ वर्षांपर्यंत कितीही वेळा परीक्षा देवू शकत होता. आणि अखेरच्या तीन वर्षांत किमान तीन संधी मिळणे आवश्यक आहे, त्याच आधारावर आयोगाने हा निर्णय दिला आहे.