शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘ओव्हर एज’ पोलीसही परीक्षेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 04:08 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी बसलेल्या ‘ओव्हर एज’(वाढीव वय) उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे

जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी बसलेल्या ‘ओव्हर एज’(वाढीव वय) उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. आता हे उमेदवार देखील आयपीएस परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे (मॅट) न्यायिक सदस्य बी. पी. मलिक यांनी बुधवारी पात्र ठरवत अंतरिम निकाल दिला. त्यामुळे पोलीस दलातील दोन हजारांवर इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीतर्फे येत्या २१ आॅगस्टला ही परीक्षा होणार आहे. उपनिरीक्षकांच्या ८२८ पदांसाठी मुंबईसह राज्यातील सात केंद्रावर परीक्षा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून सुमारे २५ हजारांवर अर्ज आल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्यापैकी दीड हजारांहून आधिक उमेदवारांचे वय हे आयोगाने निश्चित केलेल्या मर्यादेहून अधिक आहे. २०१३ व २०१४ या वर्षात ‘डिपार्टमेंटल’ परीक्षाच न झाल्याने त्यांना परीक्षेला बसण्याची संधी दिली पाहिजे, असे मलिक यांनी निकालात स्पष्ट केले आहे. त्यासाठी पाच उमेदवारांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. आता खुल्या प्रवर्गातील ३८ व मागासवर्गीय प्रवर्गातील ४३ वर्षांपर्यंतचे वयाचे उमेदवार परीक्षा देऊ शकतील.कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची अधिकारी बनण्याची इच्छा असते. त्यासाठी २५ टक्के पदे खात्यांतर्गत एमपीएससी मार्फत परीक्षा घेऊन भरली जातात. त्यासाठी पदवीधर कॉन्स्टेबल पदासाठी ४ वर्षे सेवा व बारावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी ५ वर्षे सेवा पूर्ण असणे ही प्रमुख अट आहे. त्याचप्रमाणे वय ३५ वर्षांच्या आत असणे गरजेचे असते. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत देण्यात येते. मात्र दरवर्षी परीक्षा होणे अपेक्षित असताना आयोगाने २०१३ व २०१४ या वर्षांत परीक्षाच घेतलेली नव्हती. त्यामुळे इच्छुकांना वयाबाबत शिथिलता द्यावी, अशी मागणी होती. ‘मॅट’ने ती ग्राह्य धरुन अंतरिम निकाल दिला आहे. कोणीही इच्छुक वयाच्या कारणामुळे डावलला जाऊ नये, याबाबत आयोगाने दक्षता घ्यावी, अशी सूचना मलिक यांनी केली आहे. आॅनलाइन अर्ज आणि असंतोष...एमपीएससीने या परीक्षेसाठी २६ जूनला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सुरुवातीला ‘ओव्हर एज’ उमेदवारांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांतून असंतोष व्यक्त होवू लागल्यानंतर आयोगाने त्यांचा अ‍ॅक्सेस सुरु केला.संबंधित उमेदवारांनी कितीवेळा परीक्षा दिल्या आहेत, हे नमूद करण्यासाठी स्वतंत्र रकाना बनविण्यात आला. पूर्वीच्या नियमाप्रमाणे खुल्या गटातील उमेदवार ३५ वर्षांपर्यंत कितीही वेळा परीक्षा देवू शकत होता. आणि अखेरच्या तीन वर्षांत किमान तीन संधी मिळणे आवश्यक आहे, त्याच आधारावर आयोगाने हा निर्णय दिला आहे.