शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘ओव्हर एज’ पोलीसही परीक्षेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 04:08 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी बसलेल्या ‘ओव्हर एज’(वाढीव वय) उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे

जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी बसलेल्या ‘ओव्हर एज’(वाढीव वय) उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. आता हे उमेदवार देखील आयपीएस परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे (मॅट) न्यायिक सदस्य बी. पी. मलिक यांनी बुधवारी पात्र ठरवत अंतरिम निकाल दिला. त्यामुळे पोलीस दलातील दोन हजारांवर इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीतर्फे येत्या २१ आॅगस्टला ही परीक्षा होणार आहे. उपनिरीक्षकांच्या ८२८ पदांसाठी मुंबईसह राज्यातील सात केंद्रावर परीक्षा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून सुमारे २५ हजारांवर अर्ज आल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्यापैकी दीड हजारांहून आधिक उमेदवारांचे वय हे आयोगाने निश्चित केलेल्या मर्यादेहून अधिक आहे. २०१३ व २०१४ या वर्षात ‘डिपार्टमेंटल’ परीक्षाच न झाल्याने त्यांना परीक्षेला बसण्याची संधी दिली पाहिजे, असे मलिक यांनी निकालात स्पष्ट केले आहे. त्यासाठी पाच उमेदवारांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. आता खुल्या प्रवर्गातील ३८ व मागासवर्गीय प्रवर्गातील ४३ वर्षांपर्यंतचे वयाचे उमेदवार परीक्षा देऊ शकतील.कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची अधिकारी बनण्याची इच्छा असते. त्यासाठी २५ टक्के पदे खात्यांतर्गत एमपीएससी मार्फत परीक्षा घेऊन भरली जातात. त्यासाठी पदवीधर कॉन्स्टेबल पदासाठी ४ वर्षे सेवा व बारावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी ५ वर्षे सेवा पूर्ण असणे ही प्रमुख अट आहे. त्याचप्रमाणे वय ३५ वर्षांच्या आत असणे गरजेचे असते. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत देण्यात येते. मात्र दरवर्षी परीक्षा होणे अपेक्षित असताना आयोगाने २०१३ व २०१४ या वर्षांत परीक्षाच घेतलेली नव्हती. त्यामुळे इच्छुकांना वयाबाबत शिथिलता द्यावी, अशी मागणी होती. ‘मॅट’ने ती ग्राह्य धरुन अंतरिम निकाल दिला आहे. कोणीही इच्छुक वयाच्या कारणामुळे डावलला जाऊ नये, याबाबत आयोगाने दक्षता घ्यावी, अशी सूचना मलिक यांनी केली आहे. आॅनलाइन अर्ज आणि असंतोष...एमपीएससीने या परीक्षेसाठी २६ जूनला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सुरुवातीला ‘ओव्हर एज’ उमेदवारांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांतून असंतोष व्यक्त होवू लागल्यानंतर आयोगाने त्यांचा अ‍ॅक्सेस सुरु केला.संबंधित उमेदवारांनी कितीवेळा परीक्षा दिल्या आहेत, हे नमूद करण्यासाठी स्वतंत्र रकाना बनविण्यात आला. पूर्वीच्या नियमाप्रमाणे खुल्या गटातील उमेदवार ३५ वर्षांपर्यंत कितीही वेळा परीक्षा देवू शकत होता. आणि अखेरच्या तीन वर्षांत किमान तीन संधी मिळणे आवश्यक आहे, त्याच आधारावर आयोगाने हा निर्णय दिला आहे.