शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भर दुपारी फिल्मी स्टाईलने लुटले १५ लाख !

By admin | Updated: July 14, 2016 20:49 IST

धुम स्टाईल ते दोघे सुसाट मोटारसायकवरून मिनी रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षात बसलेल्या दोघांच्या डोळ्यात त्यांनी मिरचीपूड फेकली आणि बघता बघता १५ लाखाची रोकड घेऊन

ऑनलाइन लोकमतबीड, दि.१४ -  धुम स्टाईल ते दोघे सुसाट मोटारसायकवरून मिनी रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षात बसलेल्या दोघांच्या डोळ्यात त्यांनी मिरचीपूड फेकली आणि बघता बघता १५ लाखाची रोकड घेऊन तितक्याच सुसाट वेगात ते दोघे निघूनही गेले. गेवराई तालुक्यात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बँकेची रक्कम घेऊन रिक्षातून जात असताना ही घटना घडली.शहरातील स्टेट बँक आॅफ हैद्राबादची एक शाखा धोंडराई येथे देखील आहे. या शाखेतील रोखपाल विकासकुमार गोपाल शर्मा, शिपाई दीपक आसाराम मुळुक हे दोघे गावातीलच खासगी मिनी प्रवाशी रिक्षातून (क्र. एमएच २३ जेडी २४७१) मधून गेवराईला आले होते. बँकेतून १५ लाख रुपयांची रोकड घेऊन लोखंडी पेटीत भरुन ते रिक्षातून धोंडराईला जात होते. धोंडराई फाट्यावरुन गाडी गावात जाण्यासाठी वळाल्यानंतर विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन पाठमागून आलेल्या दोघांनी चालक किशोर भाऊसाहेब खरात (रा. धोंडराई) यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांनी गाडीचा वेग कमी करताच आत बसलेल्या इतर दोघांच्या दिशेनेही त्यांनी मिरची पूड फेकली; परंतु ती डोळ्यात गेली नाही. चालकाने गाडी रोखल्यावर दुचाकीवरील दोघेही खाली उरतले. त्यांनी ह्यपेटी माझ्याकडे देह्ण असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर शिपाई मुळूक याने हात वर केले. त्याच्या दिशेने कोयत्याचा वार केल्यावर बोटाला किरकोळ जखम झाली. त्याने हात सोडताच चोरांनी पेटी घेऊन दुचाकीवरुन उमापूरच्या दिशेने पलायन केले. भयभीत अवस्थेत रोखपाल शर्मा यांनी गेवराई ठाण्यात कळविले. त्यानंतर निरीक्षक सुरेश बुधवंत फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी मिनी रिक्षा ताब्यात घेतला. दोन मिरचीपूडही आढळून आल्या. वाहनचालकासह तिघांकडे विचारपूस सुरु असून गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाधोंडराई येथील शाखेत गेवराई येथील बँकेतून आवश्यकता भासेल तशी रोकड नेली जात होती. त्यासाठी दोन वर्षांपासून गावातीलच किशोर खरात यांचा मिनी रिक्षा भाड्याने घेतला जात होता. हा रिक्षा सुरक्षेच्या दृष्टिने धोक्याचा आहे. शिवाय सुरक्षारक्षकाविनाच मोठ्या रकमेची ने- आण केली जायची. ते बँक अधिकाऱ्यांच्या अंगलट आले.तोंडाला रुमालदुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आपल्या तोंडांवर रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे मुश्किल बनले आहे. बँक अधिकारी व चालकानेही त्यांचा चेहरा नीट पाहिलेला नाही. दहशत निर्माण करुन मिरची पूड व कोयत्याचा वापर करत रक्कम पळविणाऱ्या दोन चोरांनी पाळत ठेवून कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.