शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

उत्कृष्ट संसदपटू

By admin | Updated: February 17, 2015 02:12 IST

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य.

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य. व्यवहारातील उदाहरणे, दाखले देऊन ते आपला मुद्दा लोकांच्या मनात पक्का बिंबवायचे. भाषणाच्या ओघात कोपरापासून ढोपरापर्यंत सारखे शब्दप्रयोग करत लोकांना तो मुद्दा उचलून धरण्यास भाग पाडायचे. ज्या विषयावर बोलायचे, त्यावर अपार कष्ट घेण्याची वृत्ती, टिपणे काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रवासात ग्रंथांचे, वृत्तपत्रांचे वाचन अखंड सुरू असायचे. वृत्तपत्रांच्या कात्रणापासून विविध पुस्तकांचे संदर्भ त्यांना मुखोद्गत होते. विधिमंडळाच्या कामकाजासाठी तासन्तास ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास, चिंतन, मनन करण्याचा आदर्शच आबांनी घालून दिला. त्याचाच परिपाक म्हणून राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सदस्याला दिला जाणार ‘उत्कृष्ट संसदपटू’ हा पहिला पुरस्कार आबांनी १२ डिसेंबर १९९६ रोजी युती शासनाच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना मिळविला. तत्पूर्वी १९९० पासून ‘लक्षवेधीकार’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या विधिमंडळातील भाषणांवर पुस्तकेही निघाली. ६० वर्षे वयाच्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना दरमहा ३०० रुपये निवृत्तीवेतन मिळण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या पहिल्या अशासकीय ठरावाद्वारे शासनाला केलेल्या अनेक विधायक सूचनांमधून गाजविलेले ७ डिसेंबर १९९० रोजी केलेले पहिले भाषण आजही त्या क्षणाच्या साक्षीदारांना आठवत असेल. त्यासाठी नागपूरच्या ग्रंथालयात त्यांनी अभ्यास केला. २१ एप्रिल १९९३ रोजी पाटबंधारे खात्याच्या अनुदानावरील पूरक मागण्यांच्या चर्चेवेळी कृष्णा-गोदावरी पाणीप्रश्नी लवादानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे ९५० टीएमसी पाणी २००० पर्यंत न अडवल्यास आपली बांधिलकी सरकारबरोबर नसून दुष्काळग्रस्त जनतेबरोबर असेल असा सडेतोड इशारा त्यांनी दिला. युती शासनाच्या काळात तर ते जनसामान्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत अखंड धडाडणारी मुलूखमैदान तोफ ठरले. १९९९ मध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यावर ७३ व्या व ७४ व्या घटना दुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संजीवनी देणारे ते ‘अंजनी पुत्र’ ठरले होते.