शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उत्कृष्ट संसदपटू

By admin | Updated: February 17, 2015 02:12 IST

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य.

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य. व्यवहारातील उदाहरणे, दाखले देऊन ते आपला मुद्दा लोकांच्या मनात पक्का बिंबवायचे. भाषणाच्या ओघात कोपरापासून ढोपरापर्यंत सारखे शब्दप्रयोग करत लोकांना तो मुद्दा उचलून धरण्यास भाग पाडायचे. ज्या विषयावर बोलायचे, त्यावर अपार कष्ट घेण्याची वृत्ती, टिपणे काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रवासात ग्रंथांचे, वृत्तपत्रांचे वाचन अखंड सुरू असायचे. वृत्तपत्रांच्या कात्रणापासून विविध पुस्तकांचे संदर्भ त्यांना मुखोद्गत होते. विधिमंडळाच्या कामकाजासाठी तासन्तास ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास, चिंतन, मनन करण्याचा आदर्शच आबांनी घालून दिला. त्याचाच परिपाक म्हणून राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सदस्याला दिला जाणार ‘उत्कृष्ट संसदपटू’ हा पहिला पुरस्कार आबांनी १२ डिसेंबर १९९६ रोजी युती शासनाच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना मिळविला. तत्पूर्वी १९९० पासून ‘लक्षवेधीकार’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या विधिमंडळातील भाषणांवर पुस्तकेही निघाली. ६० वर्षे वयाच्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना दरमहा ३०० रुपये निवृत्तीवेतन मिळण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या पहिल्या अशासकीय ठरावाद्वारे शासनाला केलेल्या अनेक विधायक सूचनांमधून गाजविलेले ७ डिसेंबर १९९० रोजी केलेले पहिले भाषण आजही त्या क्षणाच्या साक्षीदारांना आठवत असेल. त्यासाठी नागपूरच्या ग्रंथालयात त्यांनी अभ्यास केला. २१ एप्रिल १९९३ रोजी पाटबंधारे खात्याच्या अनुदानावरील पूरक मागण्यांच्या चर्चेवेळी कृष्णा-गोदावरी पाणीप्रश्नी लवादानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे ९५० टीएमसी पाणी २००० पर्यंत न अडवल्यास आपली बांधिलकी सरकारबरोबर नसून दुष्काळग्रस्त जनतेबरोबर असेल असा सडेतोड इशारा त्यांनी दिला. युती शासनाच्या काळात तर ते जनसामान्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत अखंड धडाडणारी मुलूखमैदान तोफ ठरले. १९९९ मध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यावर ७३ व्या व ७४ व्या घटना दुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संजीवनी देणारे ते ‘अंजनी पुत्र’ ठरले होते.