शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ओबीसींच्या डाटासाठी आऊटसोर्सिंग; अडीच कोटींचा खर्च : ११ महिन्यांसाठी ३० कर्मचारी-अधिकाऱ्यांची घेणार मदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 08:38 IST

आता राज्य मागासवर्गीय आयोगास ११ महिन्यांकरिता ३० कर्मचारी-अधिकारी यांची फौज बाह्ययंत्रणेद्वारे  घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांच्यावर अडीच कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य सरकारने सादर केलेल्या ओबीसींच्या अहवालात सखोल माहिती व शास्त्रीय आकडेवारीचा अभाव असल्याचे मत नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा ओबीसींचा अंतरिम अहवाल फेटाळून  ताशेरे ओढल्यानंतर जाग आलेल्या सरकारने आता ओबीसींचा डाटा गोळा करण्याचे काम जलद  गतीने आणि तो शासनाने दिलेल्या पद्धतीने होण्यासाठी अखेर खासगीकरणाचा आधार घेतला आहे. 

यानुसार आता राज्य मागासवर्गीय आयोगास ११ महिन्यांकरिता ३० कर्मचारी-अधिकारी यांची फौज बाह्ययंत्रणेद्वारे  घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांच्यावर अडीच कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडचणीत आल्या आहेत. कारण राज्यातील १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या २८४ पंचायत समित्या, २०८ नगरपालिका, १४ नगरपंचायती व ८०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिल, मे महिन्यांत होणार आहेत. तेथे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी आरक्षण संकटात आले आहे. यामुळे ओबीसी नेत्यांची मर्जी राखण्यासाठी सर्वच पक्षांनी ओबीसींशिवाय निवडणुका नको, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मागासवर्गीय कल्याण विभागाने अखेर मागास आयोगास ३० कर्मचारी-अधिकारी बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास तातडीने मान्यता दिली आहे. या सर्वांना २० ते ६० हजारांपर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे. यापूर्वी मागास आयोगास कार्यालयीन खर्चासह  प्रवास आणि दूरध्वनी खर्चासाठी ८४ कोटी १८ लाख ६८ हजारांचा निधी दिला आहे.

सरकारवर कोणाचाही दबाव नाहीnसर्वोच्च न्यायालयाने ताशरे ओढल्यानंतर मागासवर्गीयांची मर्जी राखण्यासाठी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. nयासंदर्भात आमच्यावर कोणाचा दबाव नसून, आम्ही त्याला भीकही घालत नाही. nआरक्षणासह निवडणुकांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा केला जाईल. nमंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. nत्यावेळी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या स्थगन प्रस्तावात  महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली, मागासवर्ग आयोगाला लागणारा निधी, कर्मचारी दिले गेले नाहीत, असे आरोप केले होते. nयानंतर सरकारने तातडीने हे ३० कर्मचारी-अधिकारी बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिली आहे.

अर्ज मागविलेयाशिवाय सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत.