शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

गावपळणीसाठी शिराळे वेशीबाहेर

By admin | Updated: January 9, 2015 00:28 IST

वार्षिक उत्सव : शाळा भरते झाडाखाली; वास्तव्य राहुट्यांमध्ये

वैभववाडी : वार्षिक गावपळणीमुळे शिराळेवासीय सडुरे गावच्या हद्दीतील राहुट्यांमध्ये दाखल झाले आहेत. पुढील पाच दिवसांत ग्रामदेवता श्री गांगोचा कौल घेऊन ते पुन्हा शिराळेत परततील. या काळात निसर्गाशी समरस होऊन ज्ञानार्जनाचा अनुभव चिमुकली बालके घेणार आहेत.शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा साडेचारशे वर्षांपासून चालत आली आहे. गावपळण हा ग्रामदेवतेचा आदेश मानून शिराळेवासीय मोठ्या श्रद्धेने दरवर्षी पाच ते सात दिवस गाव सोडतात. गावपळणीचा कौल होण्याआधीच सडुरेच्या हद्दीतील नेहमीच्या जागी झाडांच्या डहाळ्यांपासून राहुट्या उभारून ठेवतात. गावपळणीचा कौल होताच शिराळेचे ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात गाव सोडले आहे.शिराळे बनलेय सुने सुने गावपळणीला निघताना गुरेढोरे यांच्यासह शिराळेवासीय सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतर चालून सडुरेत दाखल झाले आहेत. गावात परतण्याचा कौल होईपर्यंत शिराळे गाव पुरते सुने सुने बनले आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राणीही शिराळेच्या हद्दीत फिरकत नाहीत. गावपळणीच्या दिवसात शिराळेवासीयांची दैनंदिनी राहुट्यांमधून सुरू असल्याचे दिसते. अगदी गुण्यागोविंदाने राहुट्यांमध्ये राहणाऱ्या शिराळेवासीयांच्या चेहऱ्यावर गावपळणीचा आनंद अक्षरश: ओसंडून वाहताना दिसतो.शाळा भरते झाडाखाली गावपळणीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली शिराळेची शाळा भरते. इतर दिवशी चार भिंतींमध्ये धडे गिरवत कवी कल्पनेतील निसर्ग समजावून घेणारी बालके गावपळणीच्या निमित्ताने निसर्गाशी समरस होऊन गेलेली दिसतात. प्रार्थना, पोषण आहार सारे काही झाडाखालीच होत असल्याने विद्यार्थीही उत्साही दिसतात.शिराळे हे महसूल गाव असून, ते वैभववाडी तालुक्यात आहे. दरवर्षी गावपळण होते. यापूर्वी एक महिना गावपळण होत होते; परंतु आता पाच दिवसांवर आला आहे.गावपळणीला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे. ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात.घोरीप खेळाने  होते सांगतावार्षिक गावपळणी पार पाडून गावात परतल्यावर मानकरी ग्रामदेवतेकडे कौल घेऊन नाडेघोरीप खेळाची तयारी करतात. त्यादिवशी संपूर्ण रात्र जागून पारंपरिक पद्धतीने नाडेघोरीप सादर करतात. तसेच या खेळानिमित्त गावकरी रात्रीचे सामूहिक भोजन करतात. त्यामुळे गावपळणीनंतरचे नाडेघोरीप हे शिराळेवासीयांसाठी पर्वणीच ठरते. हा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावचे लोकही शिराळेत जातात. नाडेघोरीप खेळ झाल्याखेरीज गावपळणीचे वार्षिक पूर्ण होत नाही, असा तेथील रयतेचा पूर्वापार समज आहे.