शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी शाळा-मैदानात RSS वर बंदी घाला! खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस म्हणाले, "अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
4
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
5
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
6
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
7
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
8
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
9
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
10
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
11
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
12
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
13
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
14
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
15
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
16
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
17
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
18
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
19
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
20
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

गावपळणीसाठी शिराळे वेशीबाहेर

By admin | Updated: January 9, 2015 00:28 IST

वार्षिक उत्सव : शाळा भरते झाडाखाली; वास्तव्य राहुट्यांमध्ये

वैभववाडी : वार्षिक गावपळणीमुळे शिराळेवासीय सडुरे गावच्या हद्दीतील राहुट्यांमध्ये दाखल झाले आहेत. पुढील पाच दिवसांत ग्रामदेवता श्री गांगोचा कौल घेऊन ते पुन्हा शिराळेत परततील. या काळात निसर्गाशी समरस होऊन ज्ञानार्जनाचा अनुभव चिमुकली बालके घेणार आहेत.शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा साडेचारशे वर्षांपासून चालत आली आहे. गावपळण हा ग्रामदेवतेचा आदेश मानून शिराळेवासीय मोठ्या श्रद्धेने दरवर्षी पाच ते सात दिवस गाव सोडतात. गावपळणीचा कौल होण्याआधीच सडुरेच्या हद्दीतील नेहमीच्या जागी झाडांच्या डहाळ्यांपासून राहुट्या उभारून ठेवतात. गावपळणीचा कौल होताच शिराळेचे ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात गाव सोडले आहे.शिराळे बनलेय सुने सुने गावपळणीला निघताना गुरेढोरे यांच्यासह शिराळेवासीय सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतर चालून सडुरेत दाखल झाले आहेत. गावात परतण्याचा कौल होईपर्यंत शिराळे गाव पुरते सुने सुने बनले आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राणीही शिराळेच्या हद्दीत फिरकत नाहीत. गावपळणीच्या दिवसात शिराळेवासीयांची दैनंदिनी राहुट्यांमधून सुरू असल्याचे दिसते. अगदी गुण्यागोविंदाने राहुट्यांमध्ये राहणाऱ्या शिराळेवासीयांच्या चेहऱ्यावर गावपळणीचा आनंद अक्षरश: ओसंडून वाहताना दिसतो.शाळा भरते झाडाखाली गावपळणीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली शिराळेची शाळा भरते. इतर दिवशी चार भिंतींमध्ये धडे गिरवत कवी कल्पनेतील निसर्ग समजावून घेणारी बालके गावपळणीच्या निमित्ताने निसर्गाशी समरस होऊन गेलेली दिसतात. प्रार्थना, पोषण आहार सारे काही झाडाखालीच होत असल्याने विद्यार्थीही उत्साही दिसतात.शिराळे हे महसूल गाव असून, ते वैभववाडी तालुक्यात आहे. दरवर्षी गावपळण होते. यापूर्वी एक महिना गावपळण होत होते; परंतु आता पाच दिवसांवर आला आहे.गावपळणीला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे. ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात.घोरीप खेळाने  होते सांगतावार्षिक गावपळणी पार पाडून गावात परतल्यावर मानकरी ग्रामदेवतेकडे कौल घेऊन नाडेघोरीप खेळाची तयारी करतात. त्यादिवशी संपूर्ण रात्र जागून पारंपरिक पद्धतीने नाडेघोरीप सादर करतात. तसेच या खेळानिमित्त गावकरी रात्रीचे सामूहिक भोजन करतात. त्यामुळे गावपळणीनंतरचे नाडेघोरीप हे शिराळेवासीयांसाठी पर्वणीच ठरते. हा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावचे लोकही शिराळेत जातात. नाडेघोरीप खेळ झाल्याखेरीज गावपळणीचे वार्षिक पूर्ण होत नाही, असा तेथील रयतेचा पूर्वापार समज आहे.