शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गावपळणीसाठी शिराळे वेशीबाहेर

By admin | Updated: January 9, 2015 00:28 IST

वार्षिक उत्सव : शाळा भरते झाडाखाली; वास्तव्य राहुट्यांमध्ये

वैभववाडी : वार्षिक गावपळणीमुळे शिराळेवासीय सडुरे गावच्या हद्दीतील राहुट्यांमध्ये दाखल झाले आहेत. पुढील पाच दिवसांत ग्रामदेवता श्री गांगोचा कौल घेऊन ते पुन्हा शिराळेत परततील. या काळात निसर्गाशी समरस होऊन ज्ञानार्जनाचा अनुभव चिमुकली बालके घेणार आहेत.शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा साडेचारशे वर्षांपासून चालत आली आहे. गावपळण हा ग्रामदेवतेचा आदेश मानून शिराळेवासीय मोठ्या श्रद्धेने दरवर्षी पाच ते सात दिवस गाव सोडतात. गावपळणीचा कौल होण्याआधीच सडुरेच्या हद्दीतील नेहमीच्या जागी झाडांच्या डहाळ्यांपासून राहुट्या उभारून ठेवतात. गावपळणीचा कौल होताच शिराळेचे ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात गाव सोडले आहे.शिराळे बनलेय सुने सुने गावपळणीला निघताना गुरेढोरे यांच्यासह शिराळेवासीय सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतर चालून सडुरेत दाखल झाले आहेत. गावात परतण्याचा कौल होईपर्यंत शिराळे गाव पुरते सुने सुने बनले आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राणीही शिराळेच्या हद्दीत फिरकत नाहीत. गावपळणीच्या दिवसात शिराळेवासीयांची दैनंदिनी राहुट्यांमधून सुरू असल्याचे दिसते. अगदी गुण्यागोविंदाने राहुट्यांमध्ये राहणाऱ्या शिराळेवासीयांच्या चेहऱ्यावर गावपळणीचा आनंद अक्षरश: ओसंडून वाहताना दिसतो.शाळा भरते झाडाखाली गावपळणीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली शिराळेची शाळा भरते. इतर दिवशी चार भिंतींमध्ये धडे गिरवत कवी कल्पनेतील निसर्ग समजावून घेणारी बालके गावपळणीच्या निमित्ताने निसर्गाशी समरस होऊन गेलेली दिसतात. प्रार्थना, पोषण आहार सारे काही झाडाखालीच होत असल्याने विद्यार्थीही उत्साही दिसतात.शिराळे हे महसूल गाव असून, ते वैभववाडी तालुक्यात आहे. दरवर्षी गावपळण होते. यापूर्वी एक महिना गावपळण होत होते; परंतु आता पाच दिवसांवर आला आहे.गावपळणीला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे. ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात.घोरीप खेळाने  होते सांगतावार्षिक गावपळणी पार पाडून गावात परतल्यावर मानकरी ग्रामदेवतेकडे कौल घेऊन नाडेघोरीप खेळाची तयारी करतात. त्यादिवशी संपूर्ण रात्र जागून पारंपरिक पद्धतीने नाडेघोरीप सादर करतात. तसेच या खेळानिमित्त गावकरी रात्रीचे सामूहिक भोजन करतात. त्यामुळे गावपळणीनंतरचे नाडेघोरीप हे शिराळेवासीयांसाठी पर्वणीच ठरते. हा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावचे लोकही शिराळेत जातात. नाडेघोरीप खेळ झाल्याखेरीज गावपळणीचे वार्षिक पूर्ण होत नाही, असा तेथील रयतेचा पूर्वापार समज आहे.