शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

या सहा कारणांमुळे जुळतात विवाहबाह्य 'प्रेमसंबंध'

By admin | Updated: September 14, 2016 13:33 IST

ज्यांचे लवकर लग्न झाले आहे. म्हणजे ज्यांचा विशीमध्ये विवाह झाला आहे. त्यांच्या आयुष्यात वयाच्या तिशी-पस्तीशीपर्यंत एक स्थैर्य आलेले असते.

 
ऑनलाइन लोकमत 
 
या कारणांमुळे विवाहबाह्य संबंध जुळतात. 
 
लवकर लग्न 
ज्यांचे लवकर लग्न झाले आहे. म्हणजे ज्यांचा विशीमध्ये विवाह झाला आहे. त्यांच्या आयुष्यात वयाच्या तिशी-पस्तीशीपर्यंत एक स्थैर्य आलेले असते. आपल्याला आता पूर्वीसारखे आयुष्य जगता येत नाही. आयुष्यातील उत्साह, मजा संपली आहे अशी त्यांची भावना असते असे लोक विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. 
 
चुकीच्या व्यक्तीबरोबर विवाह 
अनेकजण कुटुंबाच्या, समाजाच्या दबावामुळे लग्न करतात. पूर्णपणे ओळखत नसलेल्या व्यक्तीला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतात. पण लग्न केल्यानंतर काहीकाळाने आपण चुकीचा निर्णय घेतल्याची त्यांना जाणीव होते. या दरम्यान अशा व्यक्तींच्या संपर्कात त्यांच्या विचारांशी सुसंगत व्यक्ती  आली तर, तो किंवा ती त्या व्यक्तीच्या जवळ जातात. अशा प्रकरणात मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याची विवाहबाहय संबंधात अखेर होते. 
 
बदलाशी जुळवून घेण्यात असमर्थता 
आपल्या आयुष्यात रोज बदल घडत असतात. अनेकजण त्या बदलांशी जुळवून घेतात पण काहीवेळा गंभीर आजार, मृत्यू, बेरोजगारी, आर्थिक तंगी अशा समस्या हाताळण्यात अपयश आल्यामुळे तो किंवा ती दुस-या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. 
 
पालकत्व 
लग्नानंतर एक मूल झाल्यावर पती-पत्नीच्या नात्यात बदल होतात. पत्नी एक आई बनलेली असते. ती तिचे जास्तीत जास्त मुलाच्या वाढीवर देते. अशावेळी पतीला आपल्याकडे घरात दुर्लक्ष होतेय अशी भावना वाढीस लागते. त्यातून पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होतो. स्त्रिया मुलाचा सांभाळ करण्यात इतक्या गुंतून गेलेल्या असतात कि, त्यांना खूप उशिरा याची जाणीव होते. 
 
शरीरसुखात असमाधान 
वैवाहीक जीवनात पत्नी-पत्नीमधील लैंगिक संबंध खूप महत्वाचे असतात. जर लैंगिक संबंध मनासारखे नसतील तर अशा नात्यामध्ये हमखास दुस-या व्यक्तीचा आधार शोधला जातो. 
 
भावनिक दुरावा 
अनेकदा कुटुंब सधन असते. पैशांची कुठलीही अडचण नसते. पण पती-पत्नी भावनिक दुष्टया परस्परांपासून खूप लांब असतात. नात्यामध्ये तो संवाद नसतो त्यावेळी विवाहबाह्य संबंधांची शक्यता जास्त असते. 
 
बदलता प्राधान्यक्रम 
लग्न करणारी जोडपी अनेकदा आयुष्याच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करत नाहीत. बदलत्यावेळेनुसार प्राधान्यक्रम, गरजा बदलत जातात, अधिक स्पष्ट होतात. अशा वेळी विचार पटत नसल्याने खटके उडू लागतात त्यातून नात्यात तिस-या व्यक्तीचा प्रवेश होतो.