शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुटुंबातील वृद्धेचे मरणही ठरले बहिष्कृत

By admin | Updated: September 11, 2015 09:34 IST

लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध

नेर (यवतमाळ) : लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध महिलेच्या अंत्ययात्रेला ३ हजार लोकसंख्येपैकी एकही माणूस फिरकला नाही. केवळ बाप-लेक अन् नातवाने काढलेली ही अंत्ययात्रा अख्ख्या जिल्ह्याला सुन्न करून गेली.गावाने एखाद्या घरावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार साऱ्यांनाच ठाऊक आहे. दगडधानोरा गावात मात्र एका घरानेच संपूर्ण गावावर बहिष्कार टाकला आहे. या घटनेमागील अंतस्थ धागा शोधण्यासाठी कॅलेंडरची पाने उलटत ९ वर्षे मागे जावे लागले. २००६मध्ये गावातील एका व्यक्तीचा खून झाला. त्यात भीमराव यांचा मुलगा अवधूत आणि नातू मिलिंद आरोपी होते. या प्रकाराने मूळचेच एकलकोंडे असलेले भीमराव अधिकच खचले. काही काळानंतर अवधूत व मिलिंद निर्दोष सुटलेही. पण भीमरावच्या मनातील अढी मात्र कायम राहिली; ते आणखी विक्षिप्तासारखे वागू लागले.अवधूतही बिथरला होता. कुणीही आमच्या घरी यायचे नाही, अशी एककल्ली भूमिका या कुटुंबीयांनी स्वीकारली. कुणी घरी गेले तरी हाकलून देण्याचे प्रकार सुरू झाले. त्यांच्या विचित्र (पान ९ वर)कसाबसा अखेरचा निरोपबाजूच्याच गावात असलेली नर्मदाबाईची मुलगी या घटनेबाबत अनभिज्ञ होती. कुठून तरी उडत-उडत आईच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावर गेली अन् ती नवऱ्याला घेऊन तडक दगडधानोऱ्यात पोहोचली. तर घरी कुणीही नव्हते. काय झाले ते सांगायलाही कुणी नव्हते. तिने अंदाजानेच स्मशान गाठले. तिथे वेगळाच पेच निर्माण झाला होता. मृतदेहाच्या तुलनेत खड्डा छोटा झाला. ऐनवेळी पोहोचलेल्या जावयाने तो खणून मोठा केला. अन् नर्मदाबाईला कसाबसा अखेरचा निरोप देण्यात आला.या परिवारातील लोक कधीही गावाच्या संपर्कात राहात नव्हते. नातेवाइकांशीही बोलत नव्हते. साधे मतदानाच्या निमित्तानेही ते घराबाहेर इतरांमध्ये मिसळत नव्हते. मतदानच करीत नव्हते.- मनोज ठाकरे, पोलीस पाटील, दगडधानोराआमच्या गावात असे पहिल्यांदाच घडले. पण काय करावे? या परिवाराला त्यांच्या घरी कुणीही आलेले चालत नाही. मग गावकरी जाणार कसे?- गजानन महल्ले, ग्रामस्थ, दगडधानोरा