शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील वृद्धेचे मरणही ठरले बहिष्कृत

By admin | Updated: September 11, 2015 09:34 IST

लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध

नेर (यवतमाळ) : लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध महिलेच्या अंत्ययात्रेला ३ हजार लोकसंख्येपैकी एकही माणूस फिरकला नाही. केवळ बाप-लेक अन् नातवाने काढलेली ही अंत्ययात्रा अख्ख्या जिल्ह्याला सुन्न करून गेली.गावाने एखाद्या घरावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार साऱ्यांनाच ठाऊक आहे. दगडधानोरा गावात मात्र एका घरानेच संपूर्ण गावावर बहिष्कार टाकला आहे. या घटनेमागील अंतस्थ धागा शोधण्यासाठी कॅलेंडरची पाने उलटत ९ वर्षे मागे जावे लागले. २००६मध्ये गावातील एका व्यक्तीचा खून झाला. त्यात भीमराव यांचा मुलगा अवधूत आणि नातू मिलिंद आरोपी होते. या प्रकाराने मूळचेच एकलकोंडे असलेले भीमराव अधिकच खचले. काही काळानंतर अवधूत व मिलिंद निर्दोष सुटलेही. पण भीमरावच्या मनातील अढी मात्र कायम राहिली; ते आणखी विक्षिप्तासारखे वागू लागले.अवधूतही बिथरला होता. कुणीही आमच्या घरी यायचे नाही, अशी एककल्ली भूमिका या कुटुंबीयांनी स्वीकारली. कुणी घरी गेले तरी हाकलून देण्याचे प्रकार सुरू झाले. त्यांच्या विचित्र (पान ९ वर)कसाबसा अखेरचा निरोपबाजूच्याच गावात असलेली नर्मदाबाईची मुलगी या घटनेबाबत अनभिज्ञ होती. कुठून तरी उडत-उडत आईच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावर गेली अन् ती नवऱ्याला घेऊन तडक दगडधानोऱ्यात पोहोचली. तर घरी कुणीही नव्हते. काय झाले ते सांगायलाही कुणी नव्हते. तिने अंदाजानेच स्मशान गाठले. तिथे वेगळाच पेच निर्माण झाला होता. मृतदेहाच्या तुलनेत खड्डा छोटा झाला. ऐनवेळी पोहोचलेल्या जावयाने तो खणून मोठा केला. अन् नर्मदाबाईला कसाबसा अखेरचा निरोप देण्यात आला.या परिवारातील लोक कधीही गावाच्या संपर्कात राहात नव्हते. नातेवाइकांशीही बोलत नव्हते. साधे मतदानाच्या निमित्तानेही ते घराबाहेर इतरांमध्ये मिसळत नव्हते. मतदानच करीत नव्हते.- मनोज ठाकरे, पोलीस पाटील, दगडधानोराआमच्या गावात असे पहिल्यांदाच घडले. पण काय करावे? या परिवाराला त्यांच्या घरी कुणीही आलेले चालत नाही. मग गावकरी जाणार कसे?- गजानन महल्ले, ग्रामस्थ, दगडधानोरा