शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचं गाव-आमचा विकास’ योजनेचे त्रांगडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 08:30 IST

गावातील समस्यांचा प्राधान्यक्रम ग्रामस्थांनीच ठरवून त्यासाठी वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची मुभा ग्रामपंचायतींना देण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

अकोला ,  दि. 19 : गावातील समस्यांचा प्राधान्यक्रम ग्रामस्थांनीच ठरवून त्यासाठी वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची मुभा ग्रामपंचायतींना देण्यात आली. शासनाचा निधी डल्ला मारण्यासाठीच आहे, असा ग्रामपंचायत सरपंच-सचिवांचा डाव, तर त्याचवेळी निधी खर्चावर नियंत्रणासोबतच वाटा राहावा, यासाठी वरिष्ठांनी देयक काढण्यात घातलेला खोडा, या त्रांगड्यात ‘आमचं गाव-आमचा विकास’चा निधी बँकेतून पडून राहण्याचा दुर्दैवी प्रकार सर्वच जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. केंद्र शासनाकडून मिळणारा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठीचा विकास आराखडा आधीच तयार करण्यात आला. त्यासाठी ‘आमचं गाव-आमचा विकास’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २०१५-१६ ते २०१९-२० या काळात विकास आराखड्यातील कामे केली जाणार आहेत. ग्रामपंचायतींचा विकास आराखडा आणि हा उपक्रम सुरू करताना पंचवार्षिक बृहत विकास आराखडा व दरवर्षी वार्षिक कृती आराखडा या दोन प्रकारे करण्यात आला. आराखड्यात अपेक्षित उत्पन्नाचा अंदाज, त्या उत्पन्नाच्या मर्यादेत गरजा आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला. त्यामधून कामांची निवड करताना मानव विकास निर्देशांक विकसित करणारी कामे प्राधान्याने घ्यावी लागतात. सोबतच शाश्वत विकासाचे ध्येय ठेवूनही कामे घ्यावी लागतात. त्यानुसार ग्रामपंचायतींनी कामे घेणे सुरू केली. त्यासाठी वित्त आयोगाच्या लगतच्या दोन वर्षातील निधीचे वितरणही झाले आहे. तो निधी पंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय खर्च करण्यावर मर्यादा आणल्याने दोन वर्षात निधी खर्चाचा वांधा झाला आहे.

- सरपंच बिथरले, तक्रारींचाही परिणाम नाही ग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी तर मिळाला. तो खर्च करण्यापूर्वी आराखड्यातील कामांना तांत्रिक मंजुरी गटविकास अधिकाऱ्यांकडून घ्यावी, त्यांची मंजुरी आणि देयक काढतानाही त्यांची स्वाक्षरी असल्याशिवाय निधी खर्च करण्यावर जिल्हा परिषदेने निर्बंध घातले. याप्रकाराने जिल्ह्यातील सरपंच, सचिव पुरते बिथरले आहेत. सरपंचांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत खर्चावरील निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे. सोबतच अधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी हे निर्बंध लादल्याचा आरोपही केला आहे.

- निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी खबरदारी वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्या. काहींनी निधीचा अपहार केल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यावर नियंत्रण राहावे, निधी योग्य कामावरच खर्च व्हावा, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना अधिकार दिले, असा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. गेल्या वर्षीचा निधी खर्च केवळ १५ टक्के शासनाने २०१५-१६ साठी दिलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यात केवळ १५ टक्के खर्च झाल्याची माहिती आहे. ८५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर तशीच पडून आहे. त्यातून वित्त आयोगाचा निधी खर्चाची आणि विकास आराखड्यातील कामांची प्रगती दिसून येते.

- तालुकानिहाय झालेला खर्च (२०१५-१६) तालुका प्राप्त निधी खर्च टक्केवारी अकोला ७५६४४०८८ १६६४१६९९ २२ अकोट ३७७४७८५० ५२८४६९९ १४ तेल्हारा ४२५७८७७८ ८०८९९६३ १९ बाळापूर ३६४००८७५ ७२८०१७ ०२ पातूर ३०९८९२४४ ५२६८१७१ १७ बार्शीटाकळी ३३१२३५७८ ३३१२३५८ १० मूर्तिजापूर ३५०५९१६१ ७०११८३३ २० एकुण २९१५४३५७४ ४६३३६७४० १४ (सरासरी)

२०१६-१७ मध्ये वाटप आणि अखर्चित निधी तालुका वाटप निधी अकोट २८५९५४३२ तेल्हारा ३१७४६१२१ पातूर २३०४१२५१ मूर्तिजापूर २६१०८७५० अकोला ३९५१०२४४ बाळापूर २७१३६६५६ बार्शीटाकळी २४६५२५४६ एकूण २००७९१००० ---------------