शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

आमचे दुकान बंद झाले, तुमचे होऊ देऊ नका!

By admin | Updated: August 10, 2014 02:20 IST

लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले.

नागपूर : लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे बंद होऊ देऊ नका. वेळीच जागे व्हा. आतापासून कामाला लागा. लोकसंपर्क असलेल्या व ‘इलेक्टिव्ह मेरिट’असलेल्यांना उमेदवारी द्या, कडेवर बसलेल्यांना तिकीट देऊ नका. तरच आमदार वाढतील व तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, अशा शब्दात माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक यांच्यासह जुन्याजाणत्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. 
काँग्रेसच्या विदर्भ विभागीय मेळाव्यात नेत्यांनी अलिकडेच केलेल्या भाषणांची राजकीय वतरुळात गेले काही दिवस चर्चा आह़े मुख्यमंत्री मेळाव्यात उशिरा पोहोचले. त्यांच्या पूर्वी जुन्याजाणत्या नेत्यांनी आपल्यासह काँग्रेसच्या सामान्य कार्यकत्र्यावर कसा अन्याय होत आहे, याचा पाढा वाचला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुत्तेमवार, वासनिक, पालकमंत्री नितीन राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली. मुत्तेमवार म्हणाले, राज्यात फक्त दोनच नाव समोर येतात. मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे; ‘हम दो और हमीच दो’ असे सुरू आहे. आमची हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्ली काबीज केली, आता त्यांना आर्थिक राजधानी मुंबई काबीज करायची आहे, हे ध्यानात ठेवा. लोक म्हणतात, मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत. पण आपले पंतप्रधानही प्रामाणिक होते. निकालात काय झाले? याचा विचार करा. त्यामुळे आता तिकीट देताना जवळचा, दूरचा असे लाड करू नका, कार्यकत्र्याना न्याय द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. 
मुकुल वासनिक म्हणाले, नेत्यांमध्ये पराभवाची खंत दिसत नाही. असे बोलले जाते की, काही मंत्री मुख्यमंत्र्यांपासून दूर आहेत. काही आमदार मंत्र्यांपासून दूर आहेत. ही परिस्थिती सुधारली नाही तर वेळ हातून जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. पक्षातील व शासकीय पदे लोकसभा व विधानसभा लढलेल्या उमेदवारांच्या शिफारशीनेच दिले जातात. असेच होत राहिले तर नवे कार्यकर्ते कसे जुळतील. लोकसभेच्या पराभवाची अनेक कारणो असली तरी, कार्यकत्र्याना शासनात भागीदारी मिळाली नाही, हे देखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. 
पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, कठीण परिस्थितीत विदर्भ नेहमी काँग्रेसला साथ देतो. मात्र, नेत्यांनी विदर्भाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. विदर्भातील कार्यकत्र्याचा शासनदरबारी सन्मान व्हावा. 
वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा सन्मान करा, असेही ते म्हणाले. विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतरही नेत्यांनी सामान्यासारखे वागले पाहिजे. सहज उपलब्ध होणारी लीडरशिप हवी. नाराजीतून बाहेर गेलेली माणसे जवळ आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आ. हरिभाऊ राठोड म्हणाले, राज्य सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय आता समोर येत आहेत.
 
च्मेळाव्यात माजी खा. दत्ता मेघे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. वसंत पुरके म्हणाले, काही लोक पदाशिवाय जगू शकत नाही. सुरुवात काँग्रेसपासून झाली. राष्ट्रवादीत गेले. पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता भाजपामध्ये गेले. अशा नेत्यांचा हिशेब करा, असे आवाहन त्यांनी केले.
 
च्विलास मुत्तेमवार यांनीही मेघेंवर नेम साधला. काँग्रेसने मेघेंना सर्वकाही दिले तरी भाजपात गेले. आता तिकडेही वाईट गत आहे, अशी टीका त्यांनी केली.