शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा आमची कामगिरी सरस!

By admin | Updated: October 31, 2016 23:08 IST

कृषी मंत्री फुंडकर यांचा पत्रकार परिषदेत दावा; विदर्भ अनुशेष निर्मूलनासाठी दिला सर्वाधिक निधी.

अकोला, दि. ३१- देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात भाजपाची कामगिरी ही काँग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळापेक्षा सरस असल्याचा दावा कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपा सरकारच्या द्विवर्षपूर्तीबद्दल सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना त्यांनी विदर्भ अनुशेष निर्मूलनासाठी सर्वाधिक निधी दिला असल्याची आकडेवारी सादर करून येणार्‍या पाच वर्षात सर्व आश्‍वासनांची पूर्ती करणार असल्याची ग्वाही दिली. येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कृषी मंत्री फुंडकर म्हणाले की, विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी अमरावती विभागात केवळ दोन वर्षात ३ हजार ६0 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात हाच खर्च १ हजार ७५0 कोटी एवढा होता. दोन वर्षात २१ हजार ७३५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली; मात्र काँग्रेस आघाडीच्या काळात हीच क्षमता फक्त १0 हजार ३१४ हेक्टर एवढी होती. भूसंपादनाच्या बाबतीतही हाच प्रकार असून, काँग्रेसने ४ हजार ५१२ हेक्टर भूसंपादन केले होते. ते भाजपाच्या काळात १६ हजार ४७६ हेक्टर एवढे झाले असल्याचा दावा त्यांनी केला. पीक विमा वाटप, अ पूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी, पर्यटन, उद्योग, कृषी विकास, ई-सरकार अशा सर्व आघाड्यांवर भाजपा सरकार हे काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळापेक्षा अधिक सरस असल्याची आकडेवारी त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दोन वर्षात ११ हजार ४८३ गावांमध्ये २ लाख ४१ हजार ९७ कामे पूर्ण झाली असून, त्या माध्यमातून शाश्‍वत सिंचनाचे स्रोत खुले झाले आहेत. या सर्व कामांमुळे ४२ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून, ११ लाख ६४ हजार ३४७ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाली असून, २0१९ पर्यंत ह्यदुष्काळमुक्त महाराष्ट्रह्ण ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी अकोल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर उज्‍जवला देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात, भाजपा महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, गोपी ठाकरे आदी उपस्थित होते. खामगावात लवकरच टेक्सटाइल्स पार्क!-वस्त्रोद्योगामध्ये भाजपा सरकार हे अग्रेसर असून, अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे टेक्सटाइल्स पार्क कार्यान्वित झाला असून, ७0 हजारावर लोकांना रोजगार मिळणार आहे. असाच टेक्सटाइल पार्क लवकरच खामगाव येथे सुरू केला जाणार असून, पारस येथेही यासंदर्भात पाहणी झाली असून, पुढील टप्प्यात येथेही टेक्सटाइल पार्क सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.