शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

आपले सरकार पाच वर्षे टिकणार

By admin | Updated: February 7, 2017 04:46 IST

आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई : आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. हिंदी भाषिक पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. फडणवीस सरकार हे नोटीस पिरियडवर असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना या सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे संकेत दिले होते. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले की आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जे नोटीस वगैरे बोलत आहेत त्यांच्या मतांना त्यांच्याच पक्षात कोणीही महत्त्व देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यामागे मराठी माणसांची मते मुंबईत आपल्याकडे वळविण्याचा आपला प्रयत्न होता काय या प्रश्नात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे कोण्या एका पक्षाची मक्तेदारी कसे असू शकतात? ज्या विचारधारेला आम्ही मानतो त्या विचारधारेचे शिवरायांवरील प्रेम आणि त्यांच्या प्रतीचा आदर हा शिवसेनेपेक्षा फार आधीचा आहे. मुंबईतील मराठी माणसांचा शिवसेनेबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. मतांसाठी शिवसेनेला मराठी माणसांची आठवण होते आणि मोठी कंत्राटे देण्यापासून इतर कामांबाबत मात्र मराठी माणसाचा विसर पडतो, हे त्यांना कळून चुकले आहे. निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील का या प्रश्नात ते म्हणाले की, भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल. मुंबई महापालिकेत भाजपा ही शिवसेनेसोबत होती मग तेथील गैरव्यवहारांचे आरोप केवळ शिवसेनेवरच का, यावर मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही ‘मायनर पार्टनर’ होतो. तरीही आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठविला पण, त्यांनी कधी काँग्रेस तर कधी मनसेची मदत घेऊन प्रस्ताव मंजूर करवून घेतले.