शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आपले सरकार पाच वर्षे टिकणार

By admin | Updated: February 7, 2017 04:46 IST

आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई : आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. हिंदी भाषिक पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. फडणवीस सरकार हे नोटीस पिरियडवर असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना या सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे संकेत दिले होते. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले की आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जे नोटीस वगैरे बोलत आहेत त्यांच्या मतांना त्यांच्याच पक्षात कोणीही महत्त्व देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यामागे मराठी माणसांची मते मुंबईत आपल्याकडे वळविण्याचा आपला प्रयत्न होता काय या प्रश्नात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे कोण्या एका पक्षाची मक्तेदारी कसे असू शकतात? ज्या विचारधारेला आम्ही मानतो त्या विचारधारेचे शिवरायांवरील प्रेम आणि त्यांच्या प्रतीचा आदर हा शिवसेनेपेक्षा फार आधीचा आहे. मुंबईतील मराठी माणसांचा शिवसेनेबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. मतांसाठी शिवसेनेला मराठी माणसांची आठवण होते आणि मोठी कंत्राटे देण्यापासून इतर कामांबाबत मात्र मराठी माणसाचा विसर पडतो, हे त्यांना कळून चुकले आहे. निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील का या प्रश्नात ते म्हणाले की, भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल. मुंबई महापालिकेत भाजपा ही शिवसेनेसोबत होती मग तेथील गैरव्यवहारांचे आरोप केवळ शिवसेनेवरच का, यावर मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही ‘मायनर पार्टनर’ होतो. तरीही आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठविला पण, त्यांनी कधी काँग्रेस तर कधी मनसेची मदत घेऊन प्रस्ताव मंजूर करवून घेतले.