शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आपले सरकार पाच वर्षे टिकणार

By admin | Updated: February 7, 2017 04:46 IST

आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई : आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. हिंदी भाषिक पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. फडणवीस सरकार हे नोटीस पिरियडवर असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना या सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे संकेत दिले होते. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले की आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जे नोटीस वगैरे बोलत आहेत त्यांच्या मतांना त्यांच्याच पक्षात कोणीही महत्त्व देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यामागे मराठी माणसांची मते मुंबईत आपल्याकडे वळविण्याचा आपला प्रयत्न होता काय या प्रश्नात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे कोण्या एका पक्षाची मक्तेदारी कसे असू शकतात? ज्या विचारधारेला आम्ही मानतो त्या विचारधारेचे शिवरायांवरील प्रेम आणि त्यांच्या प्रतीचा आदर हा शिवसेनेपेक्षा फार आधीचा आहे. मुंबईतील मराठी माणसांचा शिवसेनेबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. मतांसाठी शिवसेनेला मराठी माणसांची आठवण होते आणि मोठी कंत्राटे देण्यापासून इतर कामांबाबत मात्र मराठी माणसाचा विसर पडतो, हे त्यांना कळून चुकले आहे. निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील का या प्रश्नात ते म्हणाले की, भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल. मुंबई महापालिकेत भाजपा ही शिवसेनेसोबत होती मग तेथील गैरव्यवहारांचे आरोप केवळ शिवसेनेवरच का, यावर मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही ‘मायनर पार्टनर’ होतो. तरीही आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठविला पण, त्यांनी कधी काँग्रेस तर कधी मनसेची मदत घेऊन प्रस्ताव मंजूर करवून घेतले.