शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या जिवाला कुटुंबाकडूनच धोका

By admin | Updated: October 2, 2015 03:55 IST

आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो

मुंबई : आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो. आमच्या दोघींच्या जीविताला कुटुंबापासूनच धोका आहे, असे सनातनच्या साधक प्रिया आणि प्रीती चौरसिया यांनी सांगितले. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आय. जी. खंडेलवाल आणि सनातनचे वकील संजीव पुनाळेकर देखील उपस्थित होते. माझे अपहरण झाले, ही बातमी वाचून मला खूप दु:ख झाले. यामुळे आम्ही खंडेलवाल आणि पुनाळेकर यांच्या मदतीने जगासमोर येण्याचे ठरवले. पैशांसाठी माझे आई-वडील माझे नाव बदलून कोलकाता येथील उद्योगपतीच्या मुलाशी दुसरे लग्न करण्याची जबरदस्ती केल्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, असे प्रीती चौरसियाने सांगितले. याच मुलींच्या अपहरणाची माहिती श्याम मानव यांनी दिली होती. प्रियाने त्याचा इन्कार करताना आमच्यांवर कोणत्याही प्रकारचे संमोहन झालेले नाही, असे स्पष्ट केले.मानव यांचे वय झाले आहे. ते टीआरपीसाठी आमची बदनामी करत आहेत. माझे कुटुंब त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप साधक डॉ. स्वाती यांनी केला. ----------आमची मुलगी ‘सनातन’मध्ये अडकलीमहेंद्र कांबळे ल्ल बारामतीगेल्या चार वर्षांपासून मुलगी डोळ्यासमोर नाही. त्यामुळे आम्ही पूर्णपणे खचलो आहोत. आमची मुलगी सुखरूप आमच्या घरी यावी, हीच इच्छा आहे, अशा शब्दांत सनातनची साधक शीतल हिच्या आईवडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.बारामती शहरातील शीतल ३ मार्च २०११ला घरातून बँकेत नोकरीला जाण्यासाठी बाहेर पडली. ती परत आलीच नाही. सनातनच्या आश्रमात ती अगोदर गोव्याला, आता पनवेलला आहे. तिचा फोन येत नाही. आम्ही फोन केला तर ठराविक संवाद साधल्यानंतर फोन बंद होतो. ती सुखरूप घरी यावी, हीच आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. शीतलचे वडील बेकरीमध्ये काम करतात. आई २० वर्षांपासून घरगुती खानावळ चालवते. त्यांना तीन मुली आहेत. सनातनच्या बारामतीतील केंद्र प्रमुखाकडून ती गोव्याच्या रामनाथी आश्रमात असल्याचे समजले. ७ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास आश्रम गाठला. मात्र मुलीला परत द्या म्हटल्यावर गोव्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात आमच्याच विरुद्ध तक्रार करण्यात आली. सनातनच्या साधकांनी आम्हाला पोलीस कोठडीची हवा खायला लावली, असे तिच्या पालकांनी सांगितले.