शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आमच्या जिवाला कुटुंबाकडूनच धोका

By admin | Updated: October 2, 2015 03:55 IST

आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो

मुंबई : आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो. आमच्या दोघींच्या जीविताला कुटुंबापासूनच धोका आहे, असे सनातनच्या साधक प्रिया आणि प्रीती चौरसिया यांनी सांगितले. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आय. जी. खंडेलवाल आणि सनातनचे वकील संजीव पुनाळेकर देखील उपस्थित होते. माझे अपहरण झाले, ही बातमी वाचून मला खूप दु:ख झाले. यामुळे आम्ही खंडेलवाल आणि पुनाळेकर यांच्या मदतीने जगासमोर येण्याचे ठरवले. पैशांसाठी माझे आई-वडील माझे नाव बदलून कोलकाता येथील उद्योगपतीच्या मुलाशी दुसरे लग्न करण्याची जबरदस्ती केल्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, असे प्रीती चौरसियाने सांगितले. याच मुलींच्या अपहरणाची माहिती श्याम मानव यांनी दिली होती. प्रियाने त्याचा इन्कार करताना आमच्यांवर कोणत्याही प्रकारचे संमोहन झालेले नाही, असे स्पष्ट केले.मानव यांचे वय झाले आहे. ते टीआरपीसाठी आमची बदनामी करत आहेत. माझे कुटुंब त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप साधक डॉ. स्वाती यांनी केला. ----------आमची मुलगी ‘सनातन’मध्ये अडकलीमहेंद्र कांबळे ल्ल बारामतीगेल्या चार वर्षांपासून मुलगी डोळ्यासमोर नाही. त्यामुळे आम्ही पूर्णपणे खचलो आहोत. आमची मुलगी सुखरूप आमच्या घरी यावी, हीच इच्छा आहे, अशा शब्दांत सनातनची साधक शीतल हिच्या आईवडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.बारामती शहरातील शीतल ३ मार्च २०११ला घरातून बँकेत नोकरीला जाण्यासाठी बाहेर पडली. ती परत आलीच नाही. सनातनच्या आश्रमात ती अगोदर गोव्याला, आता पनवेलला आहे. तिचा फोन येत नाही. आम्ही फोन केला तर ठराविक संवाद साधल्यानंतर फोन बंद होतो. ती सुखरूप घरी यावी, हीच आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. शीतलचे वडील बेकरीमध्ये काम करतात. आई २० वर्षांपासून घरगुती खानावळ चालवते. त्यांना तीन मुली आहेत. सनातनच्या बारामतीतील केंद्र प्रमुखाकडून ती गोव्याच्या रामनाथी आश्रमात असल्याचे समजले. ७ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास आश्रम गाठला. मात्र मुलीला परत द्या म्हटल्यावर गोव्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात आमच्याच विरुद्ध तक्रार करण्यात आली. सनातनच्या साधकांनी आम्हाला पोलीस कोठडीची हवा खायला लावली, असे तिच्या पालकांनी सांगितले.