शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

घर ना दार, वारीच आमचा परिवार!

By admin | Updated: June 29, 2016 19:33 IST

कुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन

मिलिंदकुमार साळवे,  अहमदनगरकुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन. पावलं झपाझप चालत राहतात. कुणालाही घरादाराची चिंता नाही. सर्वांचा मार्ग एकच, पंढरीचा! सर्वांना आस पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची. घरदार, सारं विसरून सारे पंढरीच्या वाटेने निघालेले. आता जवळपास महिनाभर ना घर, ना दार. साऱ्यांचा वारी हाच एक परिवार!त्र्यंबकेश्वरहून २० जूनला निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने नाशिक सोडून नगर जिल्ह्यात प्रवेश केला. संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुका ओलांडून पालखी नगरकडे निघालीय. बेलापूरचा मुक्काम आवरून बुधवारी देवळाली, राहुरीकडे प्रस्थान ठेवलं. २५ दिवसांचा प्रवास करून १४ जुलैस पंढरीत पोहोचणारी ही पालखी मजल, दरमजल करीत ‘विठ्ठल... विठ्ठल’ म्हणत एक एक मुक्काम मागे टाकीत पुढे चालली आहे. नेहमीच्या घरदार, संसार, प्रपंचातून बाहेर पडत वारकरी वारीत सामील झाले आहेत. २५ दिवस दररोज पायपीट. चार भिंतीचं घर नाही. मुक्कामाच्या ठिकाणी असेल त्या परिस्थितीत रहायचं. मंगळवारी काहीजण बेलापूर रस्त्यावरच्या काळे रसवंतीच्या परिसरात थांबले, काही पुढे निघाले. रिकाम्या शेतात वारकऱ्यांनी विसावा घेतला. ‘व्होल वावर इज अवर’ म्हणत वावरातच मुक्काम ठोकला. वर आकाशाचं छत. खाली जमिनीचा गालिचा. मिळेल, त्या ठिकाणी झोपून रात्र काढली. पहाटे उठून ज्याच्या त्याच्या पद्धतीने, मिळेल तिथं पाणी पाहून आंघोळ पांघोळ, सकाळचे निधी उरकले. पुरुषांनी मोकळ्या रानात तर महिलांनी आडोसा शोधून आंघोळी केल्या. सकाळी १०- ११ वाजेपर्यंत महिला, पुरुषांनी वाळलेले कपडे गोळा केले. कपाळाला चंदनाचा, अष्टगंधाचा टिळा. पुन्हा वारी सुरू. चहा, नाष्टा, जेवणाची भ्रांत नाही. वारीच्या वाटेवर ठिकठिकाणच्या भाविकांकडून ही सोय होते. त्याचा आस्वाद घेत घेतच पुढे सरकायचं. टाळ, मृदूंग, भजन, मधूनच विठ्ठलाचा व संत निवृत्तीनाथांचा जयघोष. नो टेन्शन!जग बदललंय तसे वारकरी बदलले. आता बहुतेक वारकऱ्यांच्या हाती मोबाईल आहेत. वारीत असले तरी गावाकडे कनेक्टिव्हिटी ठेवत त्यावरुन काहीजण पावसाची खबरबात घेत असतात. पालखीसोबत टेम्पो, ट्रक, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका असा मोठा लवाजमाही आहे. ट्रक, टेम्पो म्हणजे काही जणांचं फिरतं घरच. २३० किलो चांदीचा रथ२० जूनला त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी २५ दिवसांचा नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करीत १४ जुलैस आषाढी एकादशीला पंढरीत पोहचेल, असं पालखीचं काटेकोर वेळेचं व्यवस्थापन. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ज्ञानोबा माउलींचे गुरू व ज्येष्ठ बंधू निवृत्ती महाराजांची ही पालखी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानतर्फे निघते. शेकडो महिला, पुरूष भाविक वारकरी अतिशय शांततेत, शिस्तीत चालत असतात. पालखी रस्त्याने चालत असताना वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी प्रत्येक जण घेत असतो. २३० किलो चांदीचा रथ या पालखीचे मुख्य आकर्षण आहे. धडधाकट जसे वारीत आहेत, तसे अपंगही आहेत. काहीजण तीन चाकी सायकलीस भगवी पताका लावून पालखीसोबत विठुरायाचा गजर करीत पंढरीकडे निघाले आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसे अनेक प्रकारची, अनेक तऱ्हेची माणसं वारीत भेटतात.