शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घर ना दार, वारीच आमचा परिवार!

By admin | Updated: June 29, 2016 19:33 IST

कुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन

मिलिंदकुमार साळवे,  अहमदनगरकुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन. पावलं झपाझप चालत राहतात. कुणालाही घरादाराची चिंता नाही. सर्वांचा मार्ग एकच, पंढरीचा! सर्वांना आस पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची. घरदार, सारं विसरून सारे पंढरीच्या वाटेने निघालेले. आता जवळपास महिनाभर ना घर, ना दार. साऱ्यांचा वारी हाच एक परिवार!त्र्यंबकेश्वरहून २० जूनला निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने नाशिक सोडून नगर जिल्ह्यात प्रवेश केला. संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुका ओलांडून पालखी नगरकडे निघालीय. बेलापूरचा मुक्काम आवरून बुधवारी देवळाली, राहुरीकडे प्रस्थान ठेवलं. २५ दिवसांचा प्रवास करून १४ जुलैस पंढरीत पोहोचणारी ही पालखी मजल, दरमजल करीत ‘विठ्ठल... विठ्ठल’ म्हणत एक एक मुक्काम मागे टाकीत पुढे चालली आहे. नेहमीच्या घरदार, संसार, प्रपंचातून बाहेर पडत वारकरी वारीत सामील झाले आहेत. २५ दिवस दररोज पायपीट. चार भिंतीचं घर नाही. मुक्कामाच्या ठिकाणी असेल त्या परिस्थितीत रहायचं. मंगळवारी काहीजण बेलापूर रस्त्यावरच्या काळे रसवंतीच्या परिसरात थांबले, काही पुढे निघाले. रिकाम्या शेतात वारकऱ्यांनी विसावा घेतला. ‘व्होल वावर इज अवर’ म्हणत वावरातच मुक्काम ठोकला. वर आकाशाचं छत. खाली जमिनीचा गालिचा. मिळेल, त्या ठिकाणी झोपून रात्र काढली. पहाटे उठून ज्याच्या त्याच्या पद्धतीने, मिळेल तिथं पाणी पाहून आंघोळ पांघोळ, सकाळचे निधी उरकले. पुरुषांनी मोकळ्या रानात तर महिलांनी आडोसा शोधून आंघोळी केल्या. सकाळी १०- ११ वाजेपर्यंत महिला, पुरुषांनी वाळलेले कपडे गोळा केले. कपाळाला चंदनाचा, अष्टगंधाचा टिळा. पुन्हा वारी सुरू. चहा, नाष्टा, जेवणाची भ्रांत नाही. वारीच्या वाटेवर ठिकठिकाणच्या भाविकांकडून ही सोय होते. त्याचा आस्वाद घेत घेतच पुढे सरकायचं. टाळ, मृदूंग, भजन, मधूनच विठ्ठलाचा व संत निवृत्तीनाथांचा जयघोष. नो टेन्शन!जग बदललंय तसे वारकरी बदलले. आता बहुतेक वारकऱ्यांच्या हाती मोबाईल आहेत. वारीत असले तरी गावाकडे कनेक्टिव्हिटी ठेवत त्यावरुन काहीजण पावसाची खबरबात घेत असतात. पालखीसोबत टेम्पो, ट्रक, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका असा मोठा लवाजमाही आहे. ट्रक, टेम्पो म्हणजे काही जणांचं फिरतं घरच. २३० किलो चांदीचा रथ२० जूनला त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी २५ दिवसांचा नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करीत १४ जुलैस आषाढी एकादशीला पंढरीत पोहचेल, असं पालखीचं काटेकोर वेळेचं व्यवस्थापन. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ज्ञानोबा माउलींचे गुरू व ज्येष्ठ बंधू निवृत्ती महाराजांची ही पालखी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानतर्फे निघते. शेकडो महिला, पुरूष भाविक वारकरी अतिशय शांततेत, शिस्तीत चालत असतात. पालखी रस्त्याने चालत असताना वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी प्रत्येक जण घेत असतो. २३० किलो चांदीचा रथ या पालखीचे मुख्य आकर्षण आहे. धडधाकट जसे वारीत आहेत, तसे अपंगही आहेत. काहीजण तीन चाकी सायकलीस भगवी पताका लावून पालखीसोबत विठुरायाचा गजर करीत पंढरीकडे निघाले आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसे अनेक प्रकारची, अनेक तऱ्हेची माणसं वारीत भेटतात.