शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

घर ना दार, वारीच आमचा परिवार!

By admin | Updated: June 29, 2016 19:33 IST

कुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन

मिलिंदकुमार साळवे,  अहमदनगरकुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन. पावलं झपाझप चालत राहतात. कुणालाही घरादाराची चिंता नाही. सर्वांचा मार्ग एकच, पंढरीचा! सर्वांना आस पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची. घरदार, सारं विसरून सारे पंढरीच्या वाटेने निघालेले. आता जवळपास महिनाभर ना घर, ना दार. साऱ्यांचा वारी हाच एक परिवार!त्र्यंबकेश्वरहून २० जूनला निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने नाशिक सोडून नगर जिल्ह्यात प्रवेश केला. संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुका ओलांडून पालखी नगरकडे निघालीय. बेलापूरचा मुक्काम आवरून बुधवारी देवळाली, राहुरीकडे प्रस्थान ठेवलं. २५ दिवसांचा प्रवास करून १४ जुलैस पंढरीत पोहोचणारी ही पालखी मजल, दरमजल करीत ‘विठ्ठल... विठ्ठल’ म्हणत एक एक मुक्काम मागे टाकीत पुढे चालली आहे. नेहमीच्या घरदार, संसार, प्रपंचातून बाहेर पडत वारकरी वारीत सामील झाले आहेत. २५ दिवस दररोज पायपीट. चार भिंतीचं घर नाही. मुक्कामाच्या ठिकाणी असेल त्या परिस्थितीत रहायचं. मंगळवारी काहीजण बेलापूर रस्त्यावरच्या काळे रसवंतीच्या परिसरात थांबले, काही पुढे निघाले. रिकाम्या शेतात वारकऱ्यांनी विसावा घेतला. ‘व्होल वावर इज अवर’ म्हणत वावरातच मुक्काम ठोकला. वर आकाशाचं छत. खाली जमिनीचा गालिचा. मिळेल, त्या ठिकाणी झोपून रात्र काढली. पहाटे उठून ज्याच्या त्याच्या पद्धतीने, मिळेल तिथं पाणी पाहून आंघोळ पांघोळ, सकाळचे निधी उरकले. पुरुषांनी मोकळ्या रानात तर महिलांनी आडोसा शोधून आंघोळी केल्या. सकाळी १०- ११ वाजेपर्यंत महिला, पुरुषांनी वाळलेले कपडे गोळा केले. कपाळाला चंदनाचा, अष्टगंधाचा टिळा. पुन्हा वारी सुरू. चहा, नाष्टा, जेवणाची भ्रांत नाही. वारीच्या वाटेवर ठिकठिकाणच्या भाविकांकडून ही सोय होते. त्याचा आस्वाद घेत घेतच पुढे सरकायचं. टाळ, मृदूंग, भजन, मधूनच विठ्ठलाचा व संत निवृत्तीनाथांचा जयघोष. नो टेन्शन!जग बदललंय तसे वारकरी बदलले. आता बहुतेक वारकऱ्यांच्या हाती मोबाईल आहेत. वारीत असले तरी गावाकडे कनेक्टिव्हिटी ठेवत त्यावरुन काहीजण पावसाची खबरबात घेत असतात. पालखीसोबत टेम्पो, ट्रक, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका असा मोठा लवाजमाही आहे. ट्रक, टेम्पो म्हणजे काही जणांचं फिरतं घरच. २३० किलो चांदीचा रथ२० जूनला त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी २५ दिवसांचा नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करीत १४ जुलैस आषाढी एकादशीला पंढरीत पोहचेल, असं पालखीचं काटेकोर वेळेचं व्यवस्थापन. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ज्ञानोबा माउलींचे गुरू व ज्येष्ठ बंधू निवृत्ती महाराजांची ही पालखी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानतर्फे निघते. शेकडो महिला, पुरूष भाविक वारकरी अतिशय शांततेत, शिस्तीत चालत असतात. पालखी रस्त्याने चालत असताना वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी प्रत्येक जण घेत असतो. २३० किलो चांदीचा रथ या पालखीचे मुख्य आकर्षण आहे. धडधाकट जसे वारीत आहेत, तसे अपंगही आहेत. काहीजण तीन चाकी सायकलीस भगवी पताका लावून पालखीसोबत विठुरायाचा गजर करीत पंढरीकडे निघाले आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसे अनेक प्रकारची, अनेक तऱ्हेची माणसं वारीत भेटतात.