शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तुमची संघर्षयात्रा तर आमची संवादयात्रा - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 27, 2017 17:10 IST

शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष यात्रा होत नाही, मनापासून संघर्ष करावा लागतो.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी , दि. 27 -  शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, मनापासून संघर्ष करावा लागतो. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवले होते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्षयात्रेवर सडकून टीका केली. पिंपरीत भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारणीचा गुरुवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.   
विरोधकांना त्यांच्या कर्तृत्वामुळेच संघर्षयात्रा काढावी लागत आहे. संघर्ष यात्रेला कोणचेही समर्थन मिळाले नसून कार्यकर्त्यांना घेऊन संघर्षयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांची मिळालेली सर्व पॅकेजेस याच नेत्यांनी लाटली, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल, असे सांगून कार्यकर्त्यांना जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - 
- विश्वासाचं राजकारण केल्यानेचं भाजपाला यश 
- 2017 मध्ये मिळालेला विजय जनतेने दिलेली कामाची पावती आहे  - विकास, विश्वासाच्या राजकारणाची देशात लाट 
- ही नुसती लाट नाही, तर त्सुनामी आहे 
- लातूरमध्ये शून्यातून सत्ता मिळवली, सगळीकडे विकासाला साथ मिळत आहे
- परिवर्तन करू शकतो म्हणून आपल्याला जनतेनं कौल दिला
- भाजपा आता महाराष्ट्रव्यापी झाला आहे 
- भाजपला मिळालेलं यश हा लोकांनी दाखवलेला विश्वास आहे, तो कायम ठेवा 
 - जनतेशी असलेली नाळ तुटू देऊ नका
- मराठवाड्यात भाजपची मोठी वाढ झाली
- जनता ही राम आहे, आपल्याला रामराज्य निर्माण करायचंय 
- छोट्या पदाच्या अहंकाराने आपण लोकांपासून दूर जातो 
- सत्ता परिवर्तनाकरिता कार्यकर्ता काम करत होता. आता तसं करायचं नाही, तर समाज परिवर्तन करायचं आहे 
- काँग्रेसचे सर्व बुरूज ढासळले, पिंपरीत पवारांचा बुरुजही ढासळला, कमळ फुलले. 
- भाजपा हा महाराष्ट्रव्यापी पार्टी आहे , कोणत्याही एका विभागाचा नाही 
- एवढी वेगवेळी अनेकजण पदे घेतात, मग त्यांचं नाव कोणाला माहीत नसतं. त्याचं कर्तृव्य लक्षात राहतं 
- विजयाने उन्मत्त, अहंकारी न होता प्रामाणिकपणे काम करुन समाज परिवर्तन घडवायचंय 
- जातीचं, भ्रष्ट्राचाराचं आपल्याला राजकारण करायचं नाही 
- भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारदर्शकतेबाबत तडजोड करू नये 
- संघर्ष यात्रेला नाव दिल्यानं संघर्ष होत नाही. मनापासून संघर्ष करावा लागतो 
- संघर्ष यात्रेला समर्थन मिळाले नाही, कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष यात्रा सुरू आहे, त्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे 
- केवळ नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवलं होतं
- त्यांची संघर्ष यात्रा असेल, तर आमची संवाद यात्रा असेल 
- पंतप्रधानांचं पॅकेज आलं ते त्यांच्या आमदार, खासदारांनी खाऊन टाकलं 
- जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मागेलं त्याला शेततळं दिलं  
- जलयुक्त शिवारमुळे दुबार पेरणीची नामुष्की टळली 
- मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधला पाहिजे 
- वेगवेगळ्या योजणांच्या माध्यमातून संवाद जनतेशी साधला पाहिजे 
- तुमची संघर्षयात्रा तर आमची संवादयात्रा, आमदार, खासदार शिवारावर संवाद साधतील, एसी बसने प्रवास नसेल 
- शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच आज संघर्षयात्रा काढत आहेत 
-  देशात 11 लाख टन खरेदी, एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन खरेदी 
- 20 हजार तूर घेऊन तुम्ही शेतक-यांना रस्त्यावर सोडलं होतं 
- शेतकऱ्यांच्या नावानं व्यापारीकरण खपवून घेतलं जाणार नाही