शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

आमची पिकं जळतील!

By admin | Updated: December 14, 2015 00:01 IST

प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे

पुणे : प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे. याकडे खासकरून चासकमान लाभक्षेत्रातील शेतकरी व मुळशीकरांचे लक्ष लागून आहे. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार आहे. येथील पिकं जळून जातील अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. त्यामुळे पिके जळून जातील. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास तयार नाहीत. मात्र, उद्या प्राधिकरणाने पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले, तर शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून आहे. हाच मुद्या आम्ही उद्या प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३० दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठीचे चारापिके आहेत. ऊस वगळता ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहेत. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी पुरणार नाही. न्यायालयात आम्ही हे पटवून देऊ. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग मुळशी धरणावर होत असलेली वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी देऊ नका, असे आम्ही प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र खंदारे यांनी सांगितले. 1उजनी धरणात सध्या ५८ टीएमसी मृत साठा शिल्लक आहे. ६४ टीएमसीपर्यंत अचलसाठा असतो. समजा वरच्या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर यातील साधारण ६ टीएमसी पाणी उजनीत पोहोचेल. त्यामुळे ६४ टीएमसीच पाणी होईल. यातून उजनीचा साठा जिवंत होईल, असेही शक्य नाही. मृतसाठ्यातून पाणी शेतीसाठी न देण्याचा निर्णय आहे. मग वरील पाणी सोडून नेमके काय साध्य होणार, असाही प्रश्न याचिकाकर्त्यांनी केला आहे.चासकमान धरणात आजच्या तारखेला १३३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ९0 दलघमी पाणी गेले तर ४३ दलघमी पाणी राहील. आताचे आवर्तन गेल्याने येथील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण होणार आहे.