शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

आमची पिकं जळतील!

By admin | Updated: December 14, 2015 00:01 IST

प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे

पुणे : प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे. याकडे खासकरून चासकमान लाभक्षेत्रातील शेतकरी व मुळशीकरांचे लक्ष लागून आहे. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार आहे. येथील पिकं जळून जातील अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. त्यामुळे पिके जळून जातील. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास तयार नाहीत. मात्र, उद्या प्राधिकरणाने पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले, तर शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून आहे. हाच मुद्या आम्ही उद्या प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३० दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठीचे चारापिके आहेत. ऊस वगळता ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहेत. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी पुरणार नाही. न्यायालयात आम्ही हे पटवून देऊ. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग मुळशी धरणावर होत असलेली वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी देऊ नका, असे आम्ही प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र खंदारे यांनी सांगितले. 1उजनी धरणात सध्या ५८ टीएमसी मृत साठा शिल्लक आहे. ६४ टीएमसीपर्यंत अचलसाठा असतो. समजा वरच्या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर यातील साधारण ६ टीएमसी पाणी उजनीत पोहोचेल. त्यामुळे ६४ टीएमसीच पाणी होईल. यातून उजनीचा साठा जिवंत होईल, असेही शक्य नाही. मृतसाठ्यातून पाणी शेतीसाठी न देण्याचा निर्णय आहे. मग वरील पाणी सोडून नेमके काय साध्य होणार, असाही प्रश्न याचिकाकर्त्यांनी केला आहे.चासकमान धरणात आजच्या तारखेला १३३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ९0 दलघमी पाणी गेले तर ४३ दलघमी पाणी राहील. आताचे आवर्तन गेल्याने येथील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण होणार आहे.