शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आमची पिकं जळतील!

By admin | Updated: December 14, 2015 00:01 IST

प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे

पुणे : प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे. याकडे खासकरून चासकमान लाभक्षेत्रातील शेतकरी व मुळशीकरांचे लक्ष लागून आहे. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार आहे. येथील पिकं जळून जातील अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. त्यामुळे पिके जळून जातील. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास तयार नाहीत. मात्र, उद्या प्राधिकरणाने पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले, तर शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून आहे. हाच मुद्या आम्ही उद्या प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३० दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठीचे चारापिके आहेत. ऊस वगळता ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहेत. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी पुरणार नाही. न्यायालयात आम्ही हे पटवून देऊ. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग मुळशी धरणावर होत असलेली वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी देऊ नका, असे आम्ही प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र खंदारे यांनी सांगितले. 1उजनी धरणात सध्या ५८ टीएमसी मृत साठा शिल्लक आहे. ६४ टीएमसीपर्यंत अचलसाठा असतो. समजा वरच्या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर यातील साधारण ६ टीएमसी पाणी उजनीत पोहोचेल. त्यामुळे ६४ टीएमसीच पाणी होईल. यातून उजनीचा साठा जिवंत होईल, असेही शक्य नाही. मृतसाठ्यातून पाणी शेतीसाठी न देण्याचा निर्णय आहे. मग वरील पाणी सोडून नेमके काय साध्य होणार, असाही प्रश्न याचिकाकर्त्यांनी केला आहे.चासकमान धरणात आजच्या तारखेला १३३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ९0 दलघमी पाणी गेले तर ४३ दलघमी पाणी राहील. आताचे आवर्तन गेल्याने येथील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण होणार आहे.