शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आमची पिकं जळतील!

By admin | Updated: December 14, 2015 00:01 IST

प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे

पुणे : प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे. याकडे खासकरून चासकमान लाभक्षेत्रातील शेतकरी व मुळशीकरांचे लक्ष लागून आहे. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार आहे. येथील पिकं जळून जातील अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. त्यामुळे पिके जळून जातील. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास तयार नाहीत. मात्र, उद्या प्राधिकरणाने पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले, तर शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून आहे. हाच मुद्या आम्ही उद्या प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३० दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठीचे चारापिके आहेत. ऊस वगळता ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहेत. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी पुरणार नाही. न्यायालयात आम्ही हे पटवून देऊ. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग मुळशी धरणावर होत असलेली वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी देऊ नका, असे आम्ही प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र खंदारे यांनी सांगितले. 1उजनी धरणात सध्या ५८ टीएमसी मृत साठा शिल्लक आहे. ६४ टीएमसीपर्यंत अचलसाठा असतो. समजा वरच्या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर यातील साधारण ६ टीएमसी पाणी उजनीत पोहोचेल. त्यामुळे ६४ टीएमसीच पाणी होईल. यातून उजनीचा साठा जिवंत होईल, असेही शक्य नाही. मृतसाठ्यातून पाणी शेतीसाठी न देण्याचा निर्णय आहे. मग वरील पाणी सोडून नेमके काय साध्य होणार, असाही प्रश्न याचिकाकर्त्यांनी केला आहे.चासकमान धरणात आजच्या तारखेला १३३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ९0 दलघमी पाणी गेले तर ४३ दलघमी पाणी राहील. आताचे आवर्तन गेल्याने येथील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण होणार आहे.