शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

आमचा अजेंडा कोपर्डीच राहणार - भय्यूजी महाराज

By admin | Updated: September 21, 2016 21:50 IST

आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि तोच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या असून, मराठा समाजाने तो प्रश्न वेगळा सोडवावा

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २१ : आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि तोच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या असून, मराठा समाजाने तो प्रश्न वेगळा सोडवावा, असे स्पष्टीकरण राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या वतीने सूर्योदय परिवाराने बुधवारी येथे दिले.

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे राज्यभर मोर्चे निघत आहेत. मोर्चाच्या आयोजनातील भय्यूजी महाराज यांच्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सूर्योदय परिवाराने पत्रकार परिषद घेऊन भय्यूजी महाराज यांची बाजू विशद केली. भय्यूजी महाराजांचे निवेदनही त्यांनी प्रसिद्धीस दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, हितेन पटेल, मनोज जैस्वाल, संतोष पाटील, जितेश खुराणा, किशोर देशमुख, दीपक यादव, सत्यकुमार शेळके यावेळी उपस्थित होते.

मराठा मोर्चात मी का लक्ष घालतो, मला प्रसिद्धीचा हव्यास आहे काय, अशा चर्चा सोशल मीडियात सुरू आहेत; परंतु केवळ मानवतेच्या भूमिकेतूनच मी कोपर्डीचा प्रश्न हाती घेतला. कुणाच्या स्वार्थापायी या प्रश्नाला बिभीत्स वळण लागावे, या निर्घृण अत्याचारात बळी पडलेल्या अभागी कन्येच्या वेदनेचा तसेच तिच्या मातेचा मी अपमान समजतो,ह्णअसे भय्यूजी महाराज यांनी निवेदनात म्हटले आहे.

मागणी धसास लागेपर्यंत लढत राहणारकोपर्डीतील घटना समोर आल्यानंतर मी सर्वप्रथम तेथे पोहोचलो. दु:खी कुटुंबाला आध्यात्मिक बळ दिले. शाळेत जाण्यास घाबरलेल्या मुलींसाठी चार बसेस दिल्या. कन्याधाम सुरक्षा योजना सुरू केली, तसेच गावात संस्कार अभियान सप्ताह घेतला. पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिचे हाल करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी तेव्हापासून लावून धरली असून, ती धसास लागेपर्यंत लढत राहणार आहे,ह्णअसे निवेदनात म्हटले आहे.

श्रेय, प्रसिद्धीचा प्रश्नच नाहीकोपर्डीच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चांतून श्रेय व प्रसिद्धी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकप्रियता मला नवीन नाही. कुठलाही राजकीय स्वार्थ मला साधायचा नसून, माझा मार्ग सेवेचा आहे, असे भय्यूजी महाराज यांनी स्पष्ट केले आहे.