शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

...अन्यथा पुण्यातील नवी बांधकामे थांबवू

By admin | Updated: March 10, 2017 23:35 IST

पुण्यातील काही भागांत पाण्याची अत्यंत कमतरता का आहे? याचे समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास जूनमध्ये पुण्यातील नव्या बांधकामे थांबवू, अशी तंबी उच्च

मुंबई : पुण्यातील काही भागांत पाण्याची अत्यंत कमतरता का आहे? याचे समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास जूनमध्ये पुण्यातील नव्या बांधकामे थांबवू, अशी तंबी उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे महापालिकेला दिली.नव्या बांधकामांना परवानगी केवळ महसूलाची गणिते मांडू नका, नव्या बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मुलभूत सुविधा पुरवण्याचाही विचार करा, अशा शब्दांत मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पुणे महापालिकेला सुनावले.पुण्यातील अमोल बालवडकर यांनी बालेवाडी व बाणेर इत्यादी ठिकाणी पाण्याची प्रचंड कमतरता असून येथील रहिवाशांना पाण्याच्या टँकरसाठी दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख खर्च करावे लागतात. गेले १५ वर्षे येथील रहिवाशी अशाच स्थितीत राहात आहेत. मात्र महापालिकेने त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे कर्तव्य महापालिका पार पाडण्यास अपयशी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेला याठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.‘येथील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यात आला नाही, तर महपालिका नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ आहे, असे आम्ही समजू. याठिकाणी आत्तापर्यंत पाण्याची कमतरता का आहे, याचे समधानकारक स्पष्टीकरण नाही देऊ शकतलात तर आम्ही जूनमध्ये पुण्यातील नव्या बांधकामांना थांबवू,’ अशी तंबी देत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २४ मार्च रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)जनहित याचिकेद्वारे मागणी बालेवाडी व बाणेर या भागात पाण्याची प्रचंड कमतरता असून येथील रहिवाशांना पाण्याच्या टँकरसाठी दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख खर्च करावे लागतात. गेले १५ वर्षे येथील रहिवाशी असेच राहत आहेत. पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. पालिकेला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली