शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

...अन्यथा 26 जुलैला राज्यभर आंदोलन उभारू- अजित नवले

By admin | Updated: June 25, 2017 16:54 IST

आमच्या मागण्यांवर 26 जुलैपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर निर्णायक आंदोलनाला सुरुवात करू

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - आमच्या मागण्यांवर 26 जुलैपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर निर्णायक आंदोलनाला सुरुवात करू, असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे. ते आज मुंबईत सुकाणू समितीच्या बैठकीनंतर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटीलही उपस्थित होते. अजित नवले म्हणाले, आजच्या बैठकीत सर्व संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. राजू शेट्टी दिल्लीत असल्याने येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत. शेतक-यांना बिगर थकीत कर्जमाफी मिळायला हवी. शेतमालाला हमीभाव आणि स्वामिनाथन शिफारशीबाबत सरकारने चकार शब्द काढला नाही. आंदोलनाच्या सुरुवातीलाच 30 मागण्यांचं निवेदन सरकारला दिले आहे. त्यावर काहीच भूमिका घेण्यात आली नाही. सरकारी कर्जमाफीवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 9 जुलै रोजी नाशिक येथे सुकाणू समितीची परिषद होणार आहे. त्यानंतर नाशकातून सर्व जिल्ह्यांत संघर्ष यात्रा काढणार असून, 23 जुलैला पुण्यात संघर्ष यात्रेचा समारोप करू. शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.  
शेतकरी संघटना-आंदोलनादरम्यानच्या केसेस मागे घेण्यात आल्या नाहीत. त्या तातडीने मागे घ्याव्यात. द्राक्षे, डाळिंब, पॉलीहाऊस आदी शेतक-यांना वेगळे पॅकेज द्यावे. पंजाबच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त कुटुंबांचं सर्व कर्ज माफ करून पाच लाख द्यावे. आधी कर्ज भरा मग माफी मागा हा प्रकार अन्यायकारक आहे. कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. राज्यात व्यापारी बँकाकडून 46 हजार कोटी, सहकारी बँकांडून 34 हजार कोटींचे कर्ज शेतक-यांना मिळाले. त्यापैकी सरकारने केवळ 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली, असं म्हणत नवले यांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली.