शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

...नाहीतर लोक मारायला उठतील!

By admin | Updated: March 11, 2015 01:52 IST

महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत.

मुंबई : महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकरी आपल्या पोरीबाळींचं लग्न करायला तयार नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीने कामं केली नाहीत म्हणून ते विरोधात बसलेत, आम्हीही तसेच वागलो तर उद्या आम्ही तिकडे बसू... शेतकऱ्यांचा अंत पाहू नका... ज्या दिवशी शेतकऱ्यांत एकजूट होईल त्या दिवशी तुम्ही-आम्ही आमदार पुढे पळत सुटू आणि शेतकरी काठ्या घेऊन मारायला मागे पळतील... ती वेळ येऊ देऊ नका... असे खडे बोल शिवसेनेचे आ. गुलाबराव पाटील यांनी सरकारला ऐकवले.विधानसभेत भाजपा सदस्य डॉ. संजय कुटे आणि अन्य सदस्यांनी २९३ अंतर्गत अवकाळी पावसावर चर्चा घडवून आणली होती. त्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, भाजपा-शिवसेनेचे सरकार आले खरे; पण अधिकारी आमच्याशीच राजकारण करू लागले आहेत. तहसीलदार आमचं ऐकत नाही. मदत मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना बाप जिवंत असल्याचे तीनतीन पुरावे मागतात. मतदारसंघात फिरताना लाज वाटते. शेतकऱ्यांना राजा म्हणता पण तो भिकारी झालाय. कोणी काय केलं हेच बोलत बसू नका, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिला नाहीत तर तुमचं आमचं काम आटोपलं असं समजा... अशा शब्दांत पाटील यांनी सरकारच्या डोळ्यांत अंजन घातले.शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांनी तर सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दुधाचे भाव, धान्याचे भाव ठरवणारे तुम्ही कोण? जो पिकवतो त्याला ठरवू द्या... शेतकरी उद्ध्वस्त झालाय, ५० लाखांच्या संत्र्यांच्या बागा मोडून गेल्या, आघाडी सरकारने कापसाला ६ हजारांचा भाव दिला; तुम्ही निदान २०० रुपये तर जास्तीचे द्या. लोक आम्हाला बोलतात, काय तोंड घेऊन जायचं आम्ही लोकांकडे, असेही आ. खोतकर यांनी सुनावले.या चर्चेत भर टाकली ती भाजपाचे आशिष देशमुख यांनी. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात; पण सरकारी कर्मचाऱ्याने कधी आत्महत्या केल्याची बातमी तुम्ही वाचली का? हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे तरी ठरवा. खासदार, आमदारांनी एक वर्षाचा भत्ता आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.