शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अन्यथा मनसे आंदोलन करणार

By admin | Updated: March 6, 2017 23:20 IST

दिवसेंदिवस महागाई वाढत असून सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत.

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 6 : दिवसेंदिवस महागाई वाढत असून सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. बँकेतील व्यवहारांसाठीही आता कर आकारला जाणार आहे. त्यामुळे शासनाकडून जनतेची एक प्रकारे गळचेपी करण्यात येत असून याला विरोध करीत मनसेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या भावना शासना पर्यन्त पोहचवाव्यात असे निवेदन मनसे कडून प्रांताधिकारी नीता सावंत- शिंदे यांना देण्यात आले.मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मनसेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. यावेळी मनसेचे दया मेस्त्री, समीर आचरेकर, शैलेंद्र नेरकर आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, युती शासनाने प्रति सिलेंडर 80 रूपये दरवाढ जाहिर केली आहे. यामुळे अच्छे दिन आणणार म्हणून सांगणाऱ्या युती शासनाच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरचे दर तिप्पट वाढले आहेत. रेशन दुकानदाराना बायोमेट्रिक प्रणाली वापर करण्याची सक्ती केली जात आहे. परन्तु गोरगरीबाना धान्य तसेच रॉकेल पुरवठा वेळेवर होत नाही.भाज्य, मासे, अन्नधान्य यांचे दर वाढले आहेत. विज देयकांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. त्याकडे मंत्री , खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

जनतेच्या अनेक समस्या असून भेसळ युक्त दूध विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, सर्व खाजगी दवाखान्यात उपचारांचे दरपत्रक लावावे अशा सामान्य जनतेसाठी आमच्या मागण्या आहेत. त्याकडे मुख्यमंत्री तसेच शासनाचे लक्ष वेधावे व जनतेला न्याय द्यावा. अन्यथा मनसेला आंदोलन करावे लागेल. असेही या निवेदनात म्हटले आहे.