शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

...अन्यथा महाराजांचे सागरी स्मारक रोखू

By admin | Updated: February 26, 2016 02:27 IST

माझगाव न्यायालयाची इमारत बांधण्याकरिता राज्य सरकार निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने गुरुवारी उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. माझगाव न्यायालयाचे

मुंबई : माझगाव न्यायालयाची इमारत बांधण्याकरिता राज्य सरकार निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने गुरुवारी उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. माझगाव न्यायालयाचे बांधकाम पूर्ण करण्याकरिता ३७५ कोटी रुपये निधी लवकर मंजूर करा, अन्यथा अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रोखू, अशी तंबी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली.या इमारतीचे काम गेली दोन वर्षे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयात माझगाव बार असोसिएशनने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने राज्य सरकार न्यायालयासाठी भूखंड देण्याकरिता टाळाटाळ करीत असल्याची टीकाही केली.माझगावमध्येच सत्र न्यायालय, दंडाधिकारी न्यायालय बांधण्यात येणार आहे. मोठे कॉम्प्लेक्स उभे करण्यात येणार असल्याने राज्य सरकारने यासाठी ३७५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलीआहे. मात्र दरवर्षी सरकार केवळ १० कोटी रुपयेच निधी देत असल्यानेया कॉम्प्लेक्सचे काम रखडल्याची माहिती वकिलांनी खंडपीठालादिली. ‘महाराष्ट्रासारखे मोठे राज्य सांभाळताना तुम्हाला (सरकार) निधी न देण्याकरिता अनेक चांगल्या सबबी देता येतात. दरवर्षी १० कोटी रुपये देत राहिलात तर या कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, याचा विचार केलात का? अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी १९०० कोटी रुपयांची तरतूद तुम्ही केलीत. मात्र न्यायालयामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत काय? माझगाव न्यायालयासाठी निधीमंजूर करा; अन्यथा आम्ही याची गांभीर्याने दखल घेऊन महाराजांचे स्मारक बांधण्यावरच स्थगिती देऊ,’ असा इशारा खंडपीठाने सरकारला दिला.राज्यातील अनेक न्यायालयांच्या इमारती मोडकळीस आलेल्या स्थितीत आहेत. आम्हाला विश्वास आहे की राज्य सरकार न्यायालयांना प्राधान्य देईल,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली आहे. (प्रतिनिधी)