शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा कबड्डी टाइमपास खेळ राहील

By admin | Updated: July 11, 2015 00:11 IST

प्रशिक्षक बलवीरसिंग : कबड्डीच्या नियमांत बदल करणे आवश्यक

सचिन भोसले -कोल्हापूर -कबड्डीत चढाई करणारा खेळाडू प्रतिस्पर्धाच्या क्षेत्रात खेळाडूंना बाद करण्यासाठी प्रयत्न करीत नाही. नेमकी हीच बाब प्रेक्षकांना रुचत नाही. यासाठी दोन वेळा चढाई केल्यानंतर तिसऱ्या वेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबरोबर चढाई करणारा भिडलाच पाहिजे; अन्यथा कबड्डी हा टाइमपास खेळ होऊन जाईल. यासाठी कबड्डीच्या नियमांत आमूलाग्र बदल करणे आवश्यक असल्याचे मत भारतीय कबड्डी संघाचे व पंजाब वीज संघाचे प्रशिक्षक बलवीरसिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ४० व्या अखिल भारतीय वीज मंडळ कबड्डी स्पर्धेसाठी ते पंजाब वीज संघाचे प्रशिक्षक म्हणून आले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशातील कबड्डीवर पंजाबच्या खेळाडूंचा बोलबाला जादा आहे; कारण पंजाब सरकारने केवळ कबड्डीसाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. यामध्ये भारतीय खेल प्राधिकरणचे प्रशिक्षक कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. सध्या पारंपरिक कबड्डीबरोबरच सर्कल कबड्डीलाही चांगले दिवस आले आहेत. भारताबरोबरच कॅनडा, अमेरिका, इराण, डेन्मार्क, इटली, आदी देशांत कबड्डी खेळली जाते. भारतीय खेळाडूंना तीस ते चाळीस लाख रुपये इतके मानधन हंगामाकरिता मिळते. पंजाबच्या भूपींदरसिंह, मलकितसिंग, हरप्रीतसिंग सोनी, प्रदीपसिंग, अमरींदरसिंग या खेळाडूंना भारतीय संघातून खेळण्याची चांगली संधी आहे. सध्या देशात विविध लीग कबड्डी स्पर्धा भरविल्या जात आहेत. याचा कबड्डीच्या प्रगतीसाठी चांगला फायदा आहे. यातून खेळाडूंना पैसा, प्रतिष्ठा लाभणार आहे. कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातील काही भागांत मी यापूर्वी कबड्डी स्पर्धा खेळण्यास आलो असून येथील वातावरण हे कबड्डी, कुस्तीसाठी पोषक आहे. योग्य दिशा दिल्यास या मातीतूनही कबड्डीचे हिरे निघतील. कबड्डीत भारताचा झेंडा कायम ठेवावयाचा असेल तर शालेय स्तरावर कबड्डीसाठी सर्व राज्यांतील सरकारांनी योगदान दिले पाहिजे. कबड्डी हा मातीबरोबरच रबरी मॅटवरही खेळला जातो आहे. त्यामुळे विदेशात मॅटवर जादा खेळ होत आहे. याकरिता देशांतर्गत स्पर्धेत मातीबरोबरच मॅटचाही वापर वाढविला पाहिजे. बलवीरसिंग यांच्याविषयी थोडे...पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बलवीर यांची १९९८ साली प्रथम भारतीय कबड्डी संघात निवड झाली. पाकिस्तान, श्रीलंका, जपान, मॉरिशस, कॅनडा, इराण, डेन्मार्क, इटली या संघांविरोधात त्यांनी भारताकडून प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय २०१०मध्ये भटिंडा (पंजाब) येथे भरविण्यात आलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही कामगिरी केली. या सामन्यात भारताने दोन कोटींचे बक्षीस पटकावले. सध्याही ते भारतीय संघाचे कबड्डी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.