शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

‘...अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही’

By admin | Updated: July 10, 2017 05:18 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची पूर्तता न केल्यास पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.दोनशे आमदारांचा पाठिंबा असलेले राज्यातील सध्याचे सरकार मजबूत वाटत असले तरी ते दुबळे आहे. सत्तेत राहूनही सरकारच्या निर्णयावर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. नेहमी राजकीय भूकंपाच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेकडून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. शिवसेनेचा हा डाव जनतेला आता कळला असल्याचे अजित पवार म्हणाले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आघाडी सरकारच्या मंत्र्यांपेक्षा भाजपाचे मंत्री जवळचे वाटतात, असे वक्तव्य शिर्डी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता विखे-पाटील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका बजावत आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार व स्वातंत्र्य आहे, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.