शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

‘...अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही’

By admin | Updated: July 10, 2017 05:18 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची पूर्तता न केल्यास पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.दोनशे आमदारांचा पाठिंबा असलेले राज्यातील सध्याचे सरकार मजबूत वाटत असले तरी ते दुबळे आहे. सत्तेत राहूनही सरकारच्या निर्णयावर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. नेहमी राजकीय भूकंपाच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेकडून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. शिवसेनेचा हा डाव जनतेला आता कळला असल्याचे अजित पवार म्हणाले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आघाडी सरकारच्या मंत्र्यांपेक्षा भाजपाचे मंत्री जवळचे वाटतात, असे वक्तव्य शिर्डी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता विखे-पाटील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका बजावत आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार व स्वातंत्र्य आहे, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.