शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

... अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

By admin | Updated: July 3, 2017 00:47 IST

... अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीस सरकार ‘शब्द व आकड्यांचे राजकारण’ करत रोज एक अध्यादेश काढत आहे. कर्जमाफीतील बारकावे दूर करून माफीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. नैसर्गिक संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा कर्जमाफीची मागणी केल्याचे सांगत अजित पवार म्हणाले, सारखी-सारखी कर्जमाफी मिळावी अशी आमची अजिबात इच्छा नाही; पण नोटाबंदीनंतर शेतीमालाचे दर पडल्याने शेतकरी आणखी गाळात रूतला. त्याच्या मदतीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची मागणी लावून धरली. दोन्ही काँग्रेसचे १९ आमदार भाजप सरकारने निलंबित केल्यानेच रस्त्यावरची लढाई सुरू करून ‘संघर्षयात्रा’ काढली. संघर्षयात्रेने कर्जमाफी मिळाली असे आम्ही म्हणणार नाही, काहींनी ‘आत्मक्लेश’, ‘आसूड’ यात्रा काढली, पुणतांब्यातील शेतकरीही रस्त्यावर उतरल्याने सरकार खडबडून जागे झाले. दीड लाखांवरील रक्कम भरल्यानंतर सरकार दीड लाखाची माफी देणार आहे, शेतकऱ्यांकडे पैसे असते तर त्याने भरले नसते का? असा सवाल करत सरकारने ‘शब्दांचे व आकड्यांचे राजकारण थांबवावे’. जून २०१७ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे तत्काळ खात्यावर वर्ग करा अन्यथा अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा पवार यांनी दिला. सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ३० हजार ५०० कोटींची कर्जमाफी द्यावी लागते, असे जाहीर केले, अधिकाऱ्यांना विचारले तर अजून माहिती घेत आहोत, असे सांगतात, मग आता ३४ हजार कोटी आले कुठून? असा सवाल करत अजित पवार म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची तरतूद करण्याचा आग्रह होता, पण सरकारने ऐकले नसल्याने आता कपात करण्याची वेळ आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, संग्राम कोते-पाटील, सारंग पाटील, के. पी. पाटील, राजेश लाटकर, अनिल साळोखे, आदिल फरास आदी उपस्थित होते. एका अध्यादेशातच दीड हजार कोटींची कर्जमाफीकेंद्राच्या कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आघाडी सरकारने सरसकट वीस हजारांची मदत केली. त्यासाठी केवळ एका अध्यादेशातच दीड हजार कोटींची कर्जमाफी दिली; पण हे सरकार रोज एक अध्यादेश काढत आहे. अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार स्वत:च गोंधळलेले असल्याचे पवार यांनी सांगितले.गरजूंनाच कर्जमाफी व्हावीकाय मोजपट्टी लावायची ती लावा पण गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, अशी आमचीही भूमिका आहे. काटकसर करायची ती करा, पण रक्कम तेवढी खात्यावर वर्ग करा, असे पवार यांनी सांगितले.