शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

...अन्यथा अवमान याचिका

By admin | Updated: September 10, 2016 03:09 IST

फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात फेरीवाला संघटनांनी आता न्यायालयीन लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात फेरीवाला संघटनांनी आता न्यायालयीन लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे. महापालिकेची कारवाई चुकीची आहे. पोलीसही त्यांना बेकायदा संरक्षण देत आहेत. ही कारवाई न थांबल्यास या दोघांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिली.कल्याण-डोंबिवली शहरातील फेरीवाला संघटनांनी एकत्रित येऊन न्याय्य हक्कांसाठी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना केली आहे. कारवाईविरोधात फेरीवाल्यांमध्ये असंतोष आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी समितीतर्फे गुरुवारी बैठक झाली. महापालिकेची कारवाई बेकायदा आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार महापालिकेला फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. सध्याची कारवाई चुकीची आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचाही महापालिकेने अवमान केला आहे. त्यामुळे ही कारवाई न थांबल्यास मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यात महापालिका, पोलीस आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात येणार येईल. यासंदर्भात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही लवकरच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाईल, अशी माहिती मोरे यांनी दिली. दरम्यान, या बैठकीला मोरे यांच्यासह बबन कांबळे, संजय जाधव, प्रशांत माळी, दिनेश तावडे, राजू सोनावळे, अभय दुबे, रमेश हनुमंते, प्रशांत सरखोत आदी समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.>महापौरांच्या आदेशही धाब्यावरगणेशोत्सवात फेरीवाल्यांविरोधातील कारवाई शिथील करा, असे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले होते. मात्र याउपरही ‘क’ प्रभागात जोमाने कारवाई सुरू आहे, असा आरोप फेरीवाला संयुक्त संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत माळी यांनी केला आहे. प्रशासनाची सुरू असलेली कारवाई पाहता हे एकप्रकारे महापौरांच्या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची टीका माळी यांनी केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.