शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
3
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
4
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
5
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
6
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
7
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
8
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
9
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
10
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
11
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
12
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
13
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
14
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
15
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
16
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
17
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
18
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
19
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
20
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

दुसऱ्या पत्नीला कायदेशीर दर्जा नाही

By admin | Updated: February 11, 2016 04:07 IST

दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नीचा दर्जा दिला जाणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे पतीच्या मृत्यूपश्चात ती कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा करू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

हायकोर्ट : निवृत्तिवेतनावर दावा करता येणार नाहीमुंबई : दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नीचा दर्जा दिला जाणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे पतीच्या मृत्यूपश्चात ती कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा करू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.भारतीय विवाह संस्थेने एकपत्नी प्रथा स्वीकारली आहे. पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे, बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या पत्नीला कायदेशीर विवाह केलेल्या पत्नीचा दर्जा देणे अशक्य असल्याचे न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने मंगळवारी म्हटले. कायदेशीररीत्या केलेला विवाह अस्तित्वात असताना दुसरी पत्नी पतीच्या पश्चात त्याची विधवा म्हणून कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा करू शकत नाही, असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले.सरकारी कर्मचारी असलेल्या जयदेव पवार यांच्या मृत्यूनंतर त्याच्या निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा, यासाठी जयदेव यांची पत्नी द्रौपदा यांनी वारसा प्रमाणपत्र मिळवण्याकरिता कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला. हा अर्ज प्रलंबित असताना जयदेव यांच्या दुसऱ्या पत्नी इंदुबाई यांनीही त्या जयदेव यांची पत्नी असल्याचा दावा केला. मात्र सबळ पुरावे दाखल केले नसल्याचे म्हणत कनिष्ठ कोर्टाने द्रौपदा यांना वारसा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. भाटकर यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय अयोग्य ठरवत द्रौपदा याच जयदेव यांच्या पहिल्या पत्नी असून कायदेशीररीत्या विवाह केल्याने द्रौपदा निवृत्ती वेतनावर अधिकार सांगू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)- जयदेव यांनी त्यांचे निवृत्तिवेतन त्यांची पहिली पत्नी द्रौपदा यांना मिळावे, यासाठी इच्छापत्र केले. हे इच्छापत्र प्रमाणित करण्यात यावे, यासाठी द्रौपदाने न्यायालयात अर्ज केला. कुटुंबाचे निवृत्तिवेतन ही कोणाची मालमत्ता नाही. त्यामुळे ते कोणाला देण्यात यावे, याबाबत संबंधित व्यक्ती मृत्युपत्रात नमूद करू शकत नाही. मात्र या केसमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीने त्याचे निवृत्तिवेतन कायदेशीर विवाह केलेल्या पत्नीलाच मिळावे, असा निर्णय घेतला. कायदेशीरपणे विवाह केलेल्याच पत्नीला निवृत्तिवेतनाचा लाभ मिळावा, असा त्याचा हेतू होता, असे न्या. भाटकर यांनी निकालात म्हटले आहे.