शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अन्य राज्यांना उद्योग पळवता येणार नाहीत

By admin | Updated: December 23, 2014 00:09 IST

मागील सरकारने जाहीर केलेल्या उद्योग धोरणाची किती अंमलबजावणी झाली, त्याची माहिती घेत आहे. मात्र आयटी उद्योगांबाबतच्या धोरणात काही निर्णय घेतले जातील

प्रश्न - उद्योग विभागाबाबत आपली व्हिजन काय आहे?देसाई - महाराष्ट्र औद्योगिक आघाडीवर नेहमी पुढे राहिला आहे. हे अव्वलस्थान मजबूत करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. राज्यात मोठे, मध्यम व लघु उद्योग उभे राहावे, याकरिता प्रोत्साहन दिले जाईल. राज्यात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व्हावी व २० लाख लोकांना रोजगार मिळावा, हे लक्ष्य निश्चित केले आहे. उद्योगातील वाढ दरवर्षी १३ टक्के असावी, हे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य गाठताना अडचणी आहेत, याची जाणीव आहे. उद्योगांना सध्या ६० ते ७० परवाने घ्यावे लागतात. ही संख्या २५ वर आणण्याचा पहिल्या टप्प्यात प्रयत्न केला जाईल. उद्योग वाढीकरिता काय करता येईल, याचा अभ्यास करण्याकरिता दोन समित्या नियुक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील वीजदर हे अन्य राज्यातील उद्योगांना देण्यात येणाऱ्या दरापेक्षा जास्त आहेत. वीजदर तातडीने कमी करता आले नाहीत तरी त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात भरवशाचा वीजपुरवठा होतो, हे उद्योगांनाही मान्य आहे. राज्यातील राजवट बदलल्यावर बुटीबोरी येथे सिएट कंपनीने कारखान्याकरिता ५० एकर जमिनीची मागणी केली. ज्या दिवशी कंपनीने अर्ज केला त्याच दिवशी सायंकाळी त्यांना लेटर आॅफ इंटेन्ट देण्यात आले. यापेक्षा गतिमान कारभार कोणता असू शकतो. आता कंपनीनेही वेगवान गतीने प्रकल्प उभा करावा; याकरिता एक महिन्याच्या आत भूमिपूजन केले व कारखाना सुरू करून उत्पादन बाजारात आणण्याची मुदत जी सर्वसाधारणपणे पाच वर्षे असते ती दोन वर्षांवर आणली आहे. नागपूरमधील उद्योजकांनी त्यांना त्यांच्या बारीकसारीक कामाकरिता मुंबईला जावे लागते. येथील प्रश्न येथेच सुटले पाहिजेत, असे आदेश दिले आहेत. भूखंडावरील विकास शुल्क ५० टक्क्यांनी कमी केले. स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नावरील शिवसेनेच्या भूमिकेशी कुठलीही तडजोड होणार नाही. सर्व उद्योगात ८० टक्के रोजगार हा भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे, हे सर्व उद्योगांना बजावले आहे.प्रश्न - राज्याने जाहीर केलेल्या उद्योग धोरणाची किती अंमलबजावणी झाली व त्यामध्ये काही बदल करणार का?देसाई - मागील सरकारने जाहीर केलेल्या उद्योग धोरणाची किती अंमलबजावणी झाली, त्याची माहिती घेत आहे. मात्र आयटी उद्योगांबाबतच्या धोरणात काही निर्णय घेतले जातील. माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योग महाराष्ट्रात उभे राहावेत, याकरिता नवीन धोरण ३१ मार्च २०१५ पूर्वी जाहीर केले जाईल. वेगवेगळे खेळ व अ‍ॅनिमेशन याच्याशी संबंधित उद्योगांना महाराष्ट्रात स्थान देण्यात येईल. या क्षेत्रात बंगलोर, हैदराबाद या शहरांशी आपली स्पर्धा आहे. माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योग तेथे जाणार नाहीत, याला प्राधान्य देऊ.प्रश्न - राज्यातील एसईझेडच्या जमिनीच्या विकासाबाबत मागील सरकारने काही निर्णय घेतले. निवासी बांधकामाला परवानगी दिली. त्यामध्ये काही बदल करणार का?देसाई - एसईझेडबाबतचे धोरण तपासून पाहून निर्णय घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात अजून बारकाईने लक्ष घातलेले नाही.प्रश्न - उद्योगांबाबत महाराष्ट्राची स्पर्धा शेजारील गुजरातशी राहिली आहे. त्या राज्यात उद्योग पळवले जातात, अशी तक्रार आहे. ही तक्रार कशी दूर करणार?देसाई - आम्ही अशाप्रकारच्या सोयीसुविधा उद्योगांना पुरवणार आहोत की, त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करणे हेच अधिक लाभाचे वाटेल. यापुढे कुठल्याही राज्याला महाराष्ट्राचे उद्योग पळवता येणार नाहीत.प्रश्न - अनेकदा उद्योगांबरोबर सहमतीचे करार होतात. मात्र गुंतवणूक होतेच असे नाही. यादृष्टीने काय करणार?देसाई - महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत केले जाणारे सहमतीचे करार व येणारी प्रत्यक्ष गुंतवणूक याचे प्रमाण खूप चांगले आहे. यापुढेही हे प्रमाण असेच वाढवण्यात येईल.