शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

पुण्यात शेट्टींची गैरसोय नको म्हणूनच गेलो दुसरीकडे - सदाभाऊ खोत

By admin | Updated: March 4, 2017 18:38 IST

मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.

 
ऑनलाइन लोकमत 
 
सांगली, दि. 4 -  पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात खासदार राजू शेट्टी उतरल्याचे कळल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय नको म्हणूनच मी दुस-या विश्रामगृहाकडे गेलो होतो. यामध्ये शेट्टींपासून दूर जाण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.
 
शुक्रवारी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शेट्टी आल्याचे समजल्यानंतर खोत यांनी तेथून आपला मुक्काम दुसरीकडे हलवला होता. त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. शनिवारी खोत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. राजू शेट्टी पुणे येथे आल्याचे समजल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना जादा जागा मिळावी म्हणूनच मी तेथील पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहाकडे गेलो. यामध्ये शेट्टी यांना टाळण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेदनाहीत आणि आमच्यात कोणत्याही प्रकारची दरी निर्माण झालेली नाही. 
 
आम्ही एकत्रच असून, भविष्यातही एकत्रच राहू. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. संघटनेत पूर्वी होतो आणि भविष्यातही असेन.खा. शेट्टी यांच्याशी असलेल्या वादावर स्मितहास्य करून, आम्ही दोघे एकच असून, जे काही बोलायचे, ते बोललो आहे. आता आणखी काही बोलणार, असे सांगत ते जिल्हाधिका-यांच्या दालनात निघून गेले.
 
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
 
सदाभाऊंनी शब्द फिरविला
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सदाभाऊ खोत यांनी रयत विकास आघाडीच्या चार सदस्यांचा भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत नानासाहेब महाडिक गटाने नाराजी व्यक्त केली होती. खासदार राजू शेट्टी यांनीही पाठिंब्याबाबत निर्णय झालेला नसून, बैठकीनंतर ठरवू, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर दहा दिवसांनी शनिवारी सदाभाऊ खोत सांगलीत आले ते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पाठिंब्याबाबत विचारले. रयत विकास घाडीच्या सदस्यांचा पाठिंबा कोणाला देणार, या प्रश्नावर सदाभाऊंनी शब्द फिरवत आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊनच निर्णय होईल, असे विधान केले.