शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

पुण्यात शेट्टींची गैरसोय नको म्हणूनच गेलो दुसरीकडे - सदाभाऊ खोत

By admin | Updated: March 4, 2017 18:38 IST

मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.

 
ऑनलाइन लोकमत 
 
सांगली, दि. 4 -  पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात खासदार राजू शेट्टी उतरल्याचे कळल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय नको म्हणूनच मी दुस-या विश्रामगृहाकडे गेलो होतो. यामध्ये शेट्टींपासून दूर जाण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.
 
शुक्रवारी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शेट्टी आल्याचे समजल्यानंतर खोत यांनी तेथून आपला मुक्काम दुसरीकडे हलवला होता. त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. शनिवारी खोत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. राजू शेट्टी पुणे येथे आल्याचे समजल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना जादा जागा मिळावी म्हणूनच मी तेथील पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहाकडे गेलो. यामध्ये शेट्टी यांना टाळण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेदनाहीत आणि आमच्यात कोणत्याही प्रकारची दरी निर्माण झालेली नाही. 
 
आम्ही एकत्रच असून, भविष्यातही एकत्रच राहू. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. संघटनेत पूर्वी होतो आणि भविष्यातही असेन.खा. शेट्टी यांच्याशी असलेल्या वादावर स्मितहास्य करून, आम्ही दोघे एकच असून, जे काही बोलायचे, ते बोललो आहे. आता आणखी काही बोलणार, असे सांगत ते जिल्हाधिका-यांच्या दालनात निघून गेले.
 
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
 
सदाभाऊंनी शब्द फिरविला
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सदाभाऊ खोत यांनी रयत विकास आघाडीच्या चार सदस्यांचा भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत नानासाहेब महाडिक गटाने नाराजी व्यक्त केली होती. खासदार राजू शेट्टी यांनीही पाठिंब्याबाबत निर्णय झालेला नसून, बैठकीनंतर ठरवू, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर दहा दिवसांनी शनिवारी सदाभाऊ खोत सांगलीत आले ते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पाठिंब्याबाबत विचारले. रयत विकास घाडीच्या सदस्यांचा पाठिंबा कोणाला देणार, या प्रश्नावर सदाभाऊंनी शब्द फिरवत आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊनच निर्णय होईल, असे विधान केले.