शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

पुण्यात शेट्टींची गैरसोय नको म्हणूनच गेलो दुसरीकडे - सदाभाऊ खोत

By admin | Updated: March 4, 2017 18:38 IST

मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.

 
ऑनलाइन लोकमत 
 
सांगली, दि. 4 -  पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात खासदार राजू शेट्टी उतरल्याचे कळल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय नको म्हणूनच मी दुस-या विश्रामगृहाकडे गेलो होतो. यामध्ये शेट्टींपासून दूर जाण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.
 
शुक्रवारी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शेट्टी आल्याचे समजल्यानंतर खोत यांनी तेथून आपला मुक्काम दुसरीकडे हलवला होता. त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. शनिवारी खोत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. राजू शेट्टी पुणे येथे आल्याचे समजल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना जादा जागा मिळावी म्हणूनच मी तेथील पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहाकडे गेलो. यामध्ये शेट्टी यांना टाळण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेदनाहीत आणि आमच्यात कोणत्याही प्रकारची दरी निर्माण झालेली नाही. 
 
आम्ही एकत्रच असून, भविष्यातही एकत्रच राहू. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. संघटनेत पूर्वी होतो आणि भविष्यातही असेन.खा. शेट्टी यांच्याशी असलेल्या वादावर स्मितहास्य करून, आम्ही दोघे एकच असून, जे काही बोलायचे, ते बोललो आहे. आता आणखी काही बोलणार, असे सांगत ते जिल्हाधिका-यांच्या दालनात निघून गेले.
 
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
 
सदाभाऊंनी शब्द फिरविला
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सदाभाऊ खोत यांनी रयत विकास आघाडीच्या चार सदस्यांचा भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत नानासाहेब महाडिक गटाने नाराजी व्यक्त केली होती. खासदार राजू शेट्टी यांनीही पाठिंब्याबाबत निर्णय झालेला नसून, बैठकीनंतर ठरवू, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर दहा दिवसांनी शनिवारी सदाभाऊ खोत सांगलीत आले ते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पाठिंब्याबाबत विचारले. रयत विकास घाडीच्या सदस्यांचा पाठिंबा कोणाला देणार, या प्रश्नावर सदाभाऊंनी शब्द फिरवत आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊनच निर्णय होईल, असे विधान केले.