शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दिघी बंदर सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 04:35 IST

दिघी, मणेरी, नानवली आणि कर्लास या गावांना आश्वासन दिल्याप्रमाणे पाणीपुरवठा न केल्याने सील

मुंबई : दिघी, मणेरी, नानवली आणि कर्लास या गावांना आश्वासन दिल्याप्रमाणे पाणीपुरवठा न केल्याने सील करण्यात आलेले दिघी बंदर सुरू करण्याचा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. गावकऱ्यांना पाणीपुरवठा करणे बंद केले, तर पुन्हा बंदराला टाळे ठोकू, असा इशाराही या वेळी उच्च न्यायालयाने दिला.२०११मध्ये दिघी बंदराचे वाढीव बांधकाम करताना व्यवस्थापनाने दिघी, नानवली, कर्लास, मणेरी आदी गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार काही दिवस दिघी बंदर व्यवस्थापनाने गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करूनही दिल्या. मात्र, दिघी जवळ असलेल्या कुडकी गावाने पाणी देण्यास नकार दिल्याची सबब पुढे करत, व्यवस्थापनाने संबंधित गावांना टँकरने पाणी पुरवण्यास नकार दिला. याविरुद्ध दिघीच्या काही रहिवाशांनी अ‍ॅड. आर. मेंदाडकर व चिंतामणी भणगोजी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.२०११पासून आतापर्यंत दिघी बंदर व्यवस्थापन गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाहून उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत दिघी बंदर व्यवस्थापनासह नगरविकास विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय, रायगडचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. उच्च न्यायालयाच्या या नोटिशीनंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल रोजी दिघी बंदराला टाळे ठोकले. त्यामुळे दिघी बंदर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत सील काढण्याचे आदेश दिले. सोबतच गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात न आल्यास पुन्हा टाळे ठोकू, असा इशाराही दिला. (प्रतिनिधी)... तर पुन्हा टाळे लावणारगुरुवारच्या सुनावणीत दिघी बंदराने चार गावांना दरदिवशी पाच हजार लिटर क्षमता असलेले १०० टँकर पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी न्यायालयात ७० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्टही जमा केला. उच्च न्यायालयाने हे डिमांड ड्राफ्ट जमा करून घेत, यापुढे गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात आला नाही, तर पुन्हा बंदराला टाळे ठोकू, असा इशारा दिघी बंदर व्यवस्थापनाला देत, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिघी बंदर पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला.