शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

खून हा अपघात ठरवून विम्याची रक्कम देण्याचा आदेश

By admin | Updated: November 22, 2014 03:10 IST

अपघात विमा घेतलेल्या विमाधारकाचा खून झाला तरीही तो मृत्यू अपघातीच ठरतो, असा निकाल देऊन ग्राहक न्यायालयाने ठाण्यातील एका महिले

मुंबई: अपघात विमा घेतलेल्या विमाधारकाचा खून झाला तरीही तो मृत्यू अपघातीच ठरतो, असा निकाल देऊन ग्राहक न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेस तिच्या दिवंगत मुलाच्या विम्याची २ लाख रुपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.कायद्याच्या परिभाषेत ‘अपघात’ या शब्दाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवून त्यात खुनाचाही अंतर्भाव करणारा हा पहिलाच न्यायालयीन निकाल मानला जात आहे. ठाणे (प.) राबोडी येथे वृंदावन सोसायटीजवळ राहणाऱ्या श्यामला रघुवीर प्रभू यांनी केलेली फिर्याद मंजूर करून दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एस.एम. रत्नाकर व सदस्य एस. जी. चाबुकस्वार यांनी हा निकाल दिला.त्यानुसार नॅशनल इन्श्युरन्स कंपनीने विम्याची दोन लाख रुपयांची रक्कम जून २०१०पासूनच्या सहा टक्के व्याजासह श्यानला प्रभू यांना द्यायची आहे. याखेरीज दावा निकाली काढण्यास विलंबलावून मानसिक क्लेश दिल्याबद्दल चार हजार रुपये व न्यायालयीन खर्चापोटी तीन हजार रुपयेही विमा कंपनीने प्रभू यांना द्यायचे आहेत.फिर्यादी श्यामला प्रभू यांचा मुलगा दिलीप याचा १८ सप्टेंबर १९९६ रोजी कल्याण रेल्वे स्टेशनवर खून झाला होता. विक्रोळी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या दिलीपने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे ‘क्लासिक क्रेडिट कार्ड’ घेतले होते व त्याचा अनुषंगिक लाभ म्हणून बँकेन नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडे दिलीपचा गट अपघात विमा उतरविला होता. या विमा पॉलिसीनुसार रस्ते अपघतात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व विमान अपघातात मृत्यू झाल्यास चार लाख रुपये विमा कंपनीने वारसाला द्यायची होती. नानाविध कारणे सांगून विमा कंपनीने रक्कम देण्यास नकार दिला म्हणून ही फिर्याद दाखल केली गेली होती.दिलीपने सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु तो मंजूर होण्याआधीच त्याचा खून झाला. त्यानंतर त्याच्या विधवा पत्नीने वारसा प्रमाणपत्र व मालमत्तेतील ह्श्श्यिासाठी उच्च न्यायालयात केलेला दावाही प्रलंबित होता. त्यामुळे दिलीपचे नेमके वारस कोण व विम्याची रक्कम कोणाला देय आहे, याविषयी संदिग्धता हे विमा कंपनीने नकार देण्याचे एक कारण होते. परंतु दिलीपची विधवा पत्नी नोटीस काढूनही ग्राहक न्यायालयात आली नाही. त्याच्या वडिलांनी, दोन भावांनी व दोन बहिणींनी या विम्याच्या रकेमत आम्हाला काही वाटा नको, अशी प्रतिज्ञापत्रे केली. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने दिलीपच्या आईलाच एकमेव वारस मानून विम्याची सर्व रक्कम तिला देण्याचा निकाल दिला. (विशेष प्रतिनिधी)