शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महापालिका आयुक्तांचे आदेश कागदावरच

By admin | Updated: April 26, 2016 04:24 IST

महापालिका हद्दीतील बेकायदा व नियमबाह्य बांधकामाला प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील बेकायदा व नियमबाह्य बांधकामाला प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असून प्रभाग क्षेत्रात सर्रास बेकायदा बांधकामे होत असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, रिपाइंचे नेते जे.के. ढोके यांनी केला आहे. उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई असून आठवड्यातून दोनच दिवस नागरिकांना पाणी मिळत आहे. पर्यायी उपाययोजना म्हणून पालिकेने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या असून ५० पेक्षा जास्त बोअरवेल दुरुस्त केल्या आहेत. पाणीबाणी असताना बेकायदा बांधकामांना पाणी कुठून येते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आयुक्तांच्या आदेशावरून उपायुक्त नितीन कापडणीस यांनी बेकायदा बांधकामाला प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात शांतीनगर ते पालिकादरम्यान काही दुकाने बाधित झाली आहेत. अशा व्यापाऱ्यांना पालिकेने प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार, त्यांना दुरुस्तीची अट घातली आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला सर्रास बहुमजली विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. त्यांच्याकडे रस्ता बाधित प्रमाणपत्रे आली कशी, असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. शांतीनगर प्रवेशद्वार ते पालिकादरम्यानच्या बाधित दुकानदारांची यादी पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी गोडसे यांनी केली आहे. बाधित नसलेल्या व्यापाऱ्यांनी पालिकेचे आदेश धाब्यावर बसवत बेकायदा बांधकामे केली आहेत. (प्रतिनिधी)