शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

महापालिका आयुक्तांचे आदेश कागदावरच

By admin | Updated: April 26, 2016 04:24 IST

महापालिका हद्दीतील बेकायदा व नियमबाह्य बांधकामाला प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील बेकायदा व नियमबाह्य बांधकामाला प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असून प्रभाग क्षेत्रात सर्रास बेकायदा बांधकामे होत असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, रिपाइंचे नेते जे.के. ढोके यांनी केला आहे. उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई असून आठवड्यातून दोनच दिवस नागरिकांना पाणी मिळत आहे. पर्यायी उपाययोजना म्हणून पालिकेने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या असून ५० पेक्षा जास्त बोअरवेल दुरुस्त केल्या आहेत. पाणीबाणी असताना बेकायदा बांधकामांना पाणी कुठून येते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आयुक्तांच्या आदेशावरून उपायुक्त नितीन कापडणीस यांनी बेकायदा बांधकामाला प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात शांतीनगर ते पालिकादरम्यान काही दुकाने बाधित झाली आहेत. अशा व्यापाऱ्यांना पालिकेने प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार, त्यांना दुरुस्तीची अट घातली आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला सर्रास बहुमजली विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. त्यांच्याकडे रस्ता बाधित प्रमाणपत्रे आली कशी, असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. शांतीनगर प्रवेशद्वार ते पालिकादरम्यानच्या बाधित दुकानदारांची यादी पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी गोडसे यांनी केली आहे. बाधित नसलेल्या व्यापाऱ्यांनी पालिकेचे आदेश धाब्यावर बसवत बेकायदा बांधकामे केली आहेत. (प्रतिनिधी)