शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

मौखिक साहित्य क्षणिक असते

By admin | Updated: March 21, 2015 01:29 IST

ईशान्येकडील राज्यांमध्ये कथा, गीते आदी साहित्याचा मौखिक माध्यमातूनच अधिक प्रचार झाला. हे साहित्य एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तोंडीच पोहोचले. त्या तुलनेत लेखी साहित्य कमी प्रचलित झाले

नाशिक : ईशान्येकडील राज्यांमध्ये कथा, गीते आदी साहित्याचा मौखिक माध्यमातूनच अधिक प्रचार झाला. हे साहित्य एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तोंडीच पोहोचले. त्या तुलनेत लेखी साहित्य कमी प्रचलित झाले. मौखिक साहित्य महत्त्वाचे असले, तरी ते क्षणिक असते. त्याचा परिणाम अधिक काळ टिकत नाही. याउलट लेखी शब्दाला जास्त किंमत असते; मात्र नेमका त्याचाच अभाव असल्याने ईशान्येकडील राज्यांमधील साहित्य देशभरात पोहोचू शकले नाही, अशी खंत नागालॅँड येथील ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक तेमसुला आओ यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार तेमसुला आओ यांना ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ या वेळी त्या बोलत होत्या़ व्यासपीठावर कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, अहमदाबादच्या ‘इन्फ्लिब्नेट’ केंद्राचे संचालक डॉ. जगदीश अरोरा, उपकुलसचिव पंडित गवळी, कुसुमाग्रज अध्यासनाच्या समन्वयक माधवी धारणकर आदी उपस्थित होते. कोणतीही स्थानिक भाषा हा तेथील इतिहास व संस्कृतीचा आरसा असतो. मानवी आयुष्यात माणुसकी, प्रेमाची घुसळण भाषेद्वारे होते. मातृभाषेतून व्यक्त होणे हे संस्कृतिरक्षणाचे माध्यम असले, तरी आपण इंग्रजीतून लिखाण केले. कारण इंग्रजी भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड आहे, असे प्रतिपादन आओ यांनी या वेळी केले. मातृभाषेतील लिखाण हे संस्कृतिरक्षणाचे माध्यम आहे आणि स्थानिक भाषा हा तिथल्या लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. माणुसकी, प्रेम, सामाजिक बांधिलकी या भावना त्यातून व्यक्त होतात. तरीही आपण इंग्रजीत लिखाण केले, कारण साहित्य वैश्विक होण्यासाठी ते गरजेचे होते, असेही त्या म्हणाल्या. अरुण साधू म्हणाले, पाश्चात्त्य प्रकाशक व वाचकांना केवळ दरिद्री, बकाल भारताचे चित्रण करणारे इंग्रजी साहित्यच आवडते आणि अशाच प्रकारच्या साहित्याला आवर्जून प्रसिद्धी दिली जाते. भारतातील मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करणारे साहित्य मात्र नाकारले जाते. भालचंद्र नेमाडे यांनी सलमान रश्दींना उत्तर दिले, हे चांगलेच झाले, असेही ते म्हणाले. याशिवाय देशातील प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली. (प्रतिनिधी)