शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

मौखिक साहित्य क्षणिक असते

By admin | Updated: March 21, 2015 01:29 IST

ईशान्येकडील राज्यांमध्ये कथा, गीते आदी साहित्याचा मौखिक माध्यमातूनच अधिक प्रचार झाला. हे साहित्य एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तोंडीच पोहोचले. त्या तुलनेत लेखी साहित्य कमी प्रचलित झाले

नाशिक : ईशान्येकडील राज्यांमध्ये कथा, गीते आदी साहित्याचा मौखिक माध्यमातूनच अधिक प्रचार झाला. हे साहित्य एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तोंडीच पोहोचले. त्या तुलनेत लेखी साहित्य कमी प्रचलित झाले. मौखिक साहित्य महत्त्वाचे असले, तरी ते क्षणिक असते. त्याचा परिणाम अधिक काळ टिकत नाही. याउलट लेखी शब्दाला जास्त किंमत असते; मात्र नेमका त्याचाच अभाव असल्याने ईशान्येकडील राज्यांमधील साहित्य देशभरात पोहोचू शकले नाही, अशी खंत नागालॅँड येथील ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक तेमसुला आओ यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार तेमसुला आओ यांना ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ या वेळी त्या बोलत होत्या़ व्यासपीठावर कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, अहमदाबादच्या ‘इन्फ्लिब्नेट’ केंद्राचे संचालक डॉ. जगदीश अरोरा, उपकुलसचिव पंडित गवळी, कुसुमाग्रज अध्यासनाच्या समन्वयक माधवी धारणकर आदी उपस्थित होते. कोणतीही स्थानिक भाषा हा तेथील इतिहास व संस्कृतीचा आरसा असतो. मानवी आयुष्यात माणुसकी, प्रेमाची घुसळण भाषेद्वारे होते. मातृभाषेतून व्यक्त होणे हे संस्कृतिरक्षणाचे माध्यम असले, तरी आपण इंग्रजीतून लिखाण केले. कारण इंग्रजी भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड आहे, असे प्रतिपादन आओ यांनी या वेळी केले. मातृभाषेतील लिखाण हे संस्कृतिरक्षणाचे माध्यम आहे आणि स्थानिक भाषा हा तिथल्या लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. माणुसकी, प्रेम, सामाजिक बांधिलकी या भावना त्यातून व्यक्त होतात. तरीही आपण इंग्रजीत लिखाण केले, कारण साहित्य वैश्विक होण्यासाठी ते गरजेचे होते, असेही त्या म्हणाल्या. अरुण साधू म्हणाले, पाश्चात्त्य प्रकाशक व वाचकांना केवळ दरिद्री, बकाल भारताचे चित्रण करणारे इंग्रजी साहित्यच आवडते आणि अशाच प्रकारच्या साहित्याला आवर्जून प्रसिद्धी दिली जाते. भारतातील मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करणारे साहित्य मात्र नाकारले जाते. भालचंद्र नेमाडे यांनी सलमान रश्दींना उत्तर दिले, हे चांगलेच झाले, असेही ते म्हणाले. याशिवाय देशातील प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली. (प्रतिनिधी)