शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांची एकजूट

By admin | Updated: March 11, 2016 04:07 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज संपूर्णत: माफ करण्याची एकमुखी मागणी विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केली. दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज संपूर्णत: माफ करण्याची एकमुखी मागणी विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केली. दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले असून, केंद्रीय मदतीबाबतही राज्याची दिशाभूल केली जात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत नियम २९३नुसार उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दुष्काळाचे गांभीर्यच कळले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आत्महत्याग्रस्त भागात शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आली असल्याचे सरकार सांगते. खरेतर, सरकारलाच समुपदेशनाची गरज आहे. चारा छावण्या बंद करणाऱ्या सरकारला काय लावण्या सुरू करायच्या आहेत काय? मंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा केला. पण या दुष्काळ दौऱ्याने काय साध्य केले. मुंबईत ज्याघोषणा करता आल्या असत्या त्या तेथे जाऊन केल्या. आपल्या चुकांचे परिमार्जन जर सरकारला करायचे असेल तर संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील म्हणाले की, नापिकी आणि कर्जापायी २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील बहुतेकांवर १ लाख रुपयांपेक्षाही कमी कर्ज होते. सरकारने तिजोरी जराशी उघडून कर्जमाफी दिली असती तर या आत्महत्या टळल्या असत्या. केंद्रीय मदतीबाबतही राज्य शासन दिशाभूल करीत आहे. केंद्राने ३ हजार कोटी रुपये दिलेलेच नाहीत. केवळ ६५० कोटी रुपये दिले आहेत, असा दावा त्यांनी केला.या चर्चेत अब्दुल सत्तार, भीमराव धोंडे, डॉ. अनिल बोंडे, मधुकरराव चव्हाण आदी सदस्यांनी भाग घेतला. दुष्काळावरील चर्चा उद्याही होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)विधवांना पेन्शन देण्याची अजित पवारांची मागणीदुष्काळासारख्या गंभीर मुद्द्यावर आम्ही पोटतिडकीने बोलत असताना मुख्यमंत्री, महसूलमंत्री सभागृहात नाहीत. अशा मुद्द्यावरही मंत्री उपस्थित राहत नसतील तर आम्ही इथे गोट्या खेळायला आहोत काय, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बळीराजा उद्ध्वस्त झाला तर सरकारही उद्ध्वस्त होईल, असा इशारा पवार यांनी दिला. संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन सुरू करा, अशी मागणीही पवार यांनी केली.