शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विरोधकांचा आरोप बिनबुडाचा - खडसे

By admin | Updated: January 9, 2016 04:09 IST

‘राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच्या मदतीत युती शासनाने कपात केल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा असून,

मुंबई : ‘राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच्या मदतीत युती शासनाने कपात केल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा असून, उलट मदतीसाठी पात्रतेची अट ५० टक्क्यांहून ३३ टक्क्यांपर्यंत शिथिल केल्याने त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना झाला आहे. शिवाय, मदतीच्या रकमेतही वाढ केली आहे,’ असा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.खडसे म्हणाले, २०१४ साली कोेरडवाहू शेतीसाठी ४,५०० रुपये प्रति हेक्टर मदत दिली गेली होती. त्यात वाढ करून या वर्षी ही मदत ६००० रुपये प्रति हेक्टर दिली गेली. तर ओलिताखालील शेतीस तेव्हा ९ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली गेली होती. ती या वर्षी १३,५०० रुपयेप्रति हेक्टर देण्यात आलीआहे. बहुवर्षीय फळपिकांसाठीसुद्धा गेल्या वर्षी १२ हजार रुपयेमदत देण्यात आली होती तीया वर्षी १८,००० रुपये प्रति हेक्टर दिली गेली. दुष्काळासह इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे म्हणजेच गारपीट, पूर, कीटकांचा प्रादुर्भाव आदींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी आता हेच सुधारित दर ठेवण्यात आले असून, मदतीस पात्र होण्यासाठीसुध्द्धा ५० टक्के नुकसानीची अट शिथिल करून ती ३३ टक्क्यांवर आणण्यात आल्याचे ते म्हणाले. आघाडी सरकारच्या काळातच कमी मदत दिली गेली. त्यामुळे विरोधकांनी कांगावा सुरू केला आहे, असा टोलाही खडसे यांनी लगावला. (प्रतिनिधी)