शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

विरोधकांचा आरोप बिनबुडाचा - खडसे

By admin | Updated: January 9, 2016 04:09 IST

‘राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच्या मदतीत युती शासनाने कपात केल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा असून,

मुंबई : ‘राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच्या मदतीत युती शासनाने कपात केल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा असून, उलट मदतीसाठी पात्रतेची अट ५० टक्क्यांहून ३३ टक्क्यांपर्यंत शिथिल केल्याने त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना झाला आहे. शिवाय, मदतीच्या रकमेतही वाढ केली आहे,’ असा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.खडसे म्हणाले, २०१४ साली कोेरडवाहू शेतीसाठी ४,५०० रुपये प्रति हेक्टर मदत दिली गेली होती. त्यात वाढ करून या वर्षी ही मदत ६००० रुपये प्रति हेक्टर दिली गेली. तर ओलिताखालील शेतीस तेव्हा ९ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली गेली होती. ती या वर्षी १३,५०० रुपयेप्रति हेक्टर देण्यात आलीआहे. बहुवर्षीय फळपिकांसाठीसुद्धा गेल्या वर्षी १२ हजार रुपयेमदत देण्यात आली होती तीया वर्षी १८,००० रुपये प्रति हेक्टर दिली गेली. दुष्काळासह इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे म्हणजेच गारपीट, पूर, कीटकांचा प्रादुर्भाव आदींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी आता हेच सुधारित दर ठेवण्यात आले असून, मदतीस पात्र होण्यासाठीसुध्द्धा ५० टक्के नुकसानीची अट शिथिल करून ती ३३ टक्क्यांवर आणण्यात आल्याचे ते म्हणाले. आघाडी सरकारच्या काळातच कमी मदत दिली गेली. त्यामुळे विरोधकांनी कांगावा सुरू केला आहे, असा टोलाही खडसे यांनी लगावला. (प्रतिनिधी)