शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

चुकीच्या परंपरेला विरोध

By admin | Updated: February 29, 2016 04:13 IST

समाजात असलेल्या चुकीच्या परंपरेला आमचा विरोध आहे. आम्ही सुरू केलेला लढा हा स्त्री-पुरुष समानतेचा आहे. तो कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे मत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई

लातूर : समाजात असलेल्या चुकीच्या परंपरेला आमचा विरोध आहे. आम्ही सुरू केलेला लढा हा स्त्री-पुरुष समानतेचा आहे. तो कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे मत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी लातुरात रविवारी प्रबोधन मेळाव्यात मांडले.येथील ‘दयानंद’च्या सभागृहात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शनिशिंगणापूर येथील शनि देवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. २१ व्या शतकात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर शनि देवाच्या दर्शनासाठी महिलांना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारला जात आहे. यातून महिलांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातील प्रत्येक मंदिरात महिलांनाही पूजा आणि अभिषेकाचा अधिकार मिळाला पाहिजे.स्त्री-पुरुष समानतेसाठी हे आंदोलन सुरू आहे. घटनेने दिलेला समानतेचा अधिकार महिलांनाही मिळाला पाहिजे. हे आंदोलन देव आणि धर्माच्या विरोधात नाही. समतेसाठी हा सुरू असलेला आमचा लढा असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.