शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध

By admin | Updated: April 8, 2017 04:44 IST

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये

टिटवाळा/बिर्लागेट : मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये, ही शेतकऱ्यांची मागणी फेटाळून लावत शुक्रवारी कल्याण तालुक्यातील राया, निंबवली, गुरवलीत जमिनीच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले. प्रचंड प्रमाणात पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगलविरोधी पोलीस पथक तैनात करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत कडाडून विरोध केला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाला गेले महिनाभर विरोध सुरू आहे. बाधित होणाऱ्या दहा गावांपैकी तीन गावांत जमिनीची मोजणी होणार असल्याने गुरूवारी पोलिसांनी शेतकऱ्यांची बैठक फळेगावात घेतली. तेव्हा मुख्यमंत्री, शरद पवार, संघर्ष समितीच्या नेत्यांची बैठक होईपर्यंत मोजणी करू नये, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तरीही मोजणीचा निर्णय झाल्याने राये गावाजवळ फळेगांव, उशीद, दानबाव, उतणे, चिंचवली, निंबवली, गुरवली, रूंदेव नदगाव येथील शेकडो शेतकरी काळ््या फिती लावून जमले. नंतर प्रचंड पोलीस फौजफाट्यासह कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे आणि मोजणी करणाऱ्या दोन टीम आल्या. पोलिसांच्या एका तुकडीने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखून धरले, तर दुसऱ्या तुकडीने मोजणी करणाऱ्यांना संरक्षण पुरवले. त्यानंतरही घोषणा सुरूच राहिल्याने राज्य राखीव पोलीस दल, दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आल्याने शेतकरी भडकले. आमच्याच जमिनी बळजबरीने घेत आहात आणि आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देत असल्याचा निषेध त्यांनी केला. ‘शेती आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची,’ ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय,’ ‘आमचा रु पया दुपारी, मोदी सरकार भिकारी,’ अशा घोषणांनी भर उन्हात वातावरण अधिकच तापले. शेतकऱ्यांचा विरोध प्रखर होत गेल्याने पोलिसांनी स्त्रियांसह शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)>जबरदस्ती नाहीसमृद्धी महामार्गामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील १०७ हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. मोजणीनंतरच कुणाची किती जमीन जाईल, ते समजेल. त्यात कोणतीही जबरदस्ती करण्यात येत नाही. सध्या राया, निंबवली व गुरवलीत मोजणी झाली आहे.- किरण सुरवसे, तहसीलदार ,कल्याण ही सरकारची हुकूमशाही व जबरदस्ती आहे.शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही राज्यातून शेतकऱ्यांना एकत्र करू.- विश्वनाथ पाटील, कुणबी सेनाप्रमुख शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असतानाही पोलिसी बळाचा वापर करून हा सर्व्हे केल्याने भविष्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. - चंद्रकांत भोईर, समन्वयक, संघर्ष समिती, कल्याण मोजणी शांततेत सुरू होती. शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांनी स्वत:हून जेलभरो आंदोलन केले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. - प्रशांत कदम, अप्पर पोलीस अधीक्षक