शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

महावितरणाच्या दरवाढीस वसईत विरोध

By admin | Updated: August 4, 2016 02:39 IST

राज्यात वीज दर ३५ ते ५० टक्के असताना महाराष्ट्र राज्यात आधीच जास्त असलेले वीज दर आणखीन वाढवण्याची मागणी ग्राहकांना लुटणारी असून महावितरण कंपनीस वाढ मुळीच देऊ नये

वसई : अन्य राज्यात वीज दर ३५ ते ५० टक्के असताना महाराष्ट्र राज्यात आधीच जास्त असलेले वीज दर आणखीन वाढवण्याची मागणी ग्राहकांना लुटणारी असून महावितरण कंपनीस वाढ मुळीच देऊ नये अशी मागणी प्रदेश जनता दलाचे नेते व राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आणि महासचिव मनवेल तुस्कानो यांनी वीज नियमाक आयोगासमोर सुनावणीत बोलताना केली. अन्य राज्यातील वीज दराच्या पातळीवर येईपर्यंत वीज दर कमी करावेत (१०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर कमी करावेत) अशीही मागणी त्यांनी केली. महावितरणे ५६३७२ कोटी रुपये दरवाढीसाठी वीज नियमाक आयोगासमोर पिटीशन दाखल केला आहे. त्याची सुनावणी नेरुळ येथे तीन न्यायमुर्तींसमोर झाली. यावेळी मनवेल तुस्कानो यांनी भ्रष्टाचार, गलथान कारभार, वीज गळती, वीज चोरी, थकबाकीदार यांच्यामुळे आलेली तुट भरुन काढण्यासाठी सर्व ग्राहकांवर वीज दरवाढ करु नये, देशात समान वीज दर असावेत, मुंबईत तीन वितरण कंपन्या आहेत, त्यांचे दर कमी मग राज्यात जास्त कसे असे मुद्दे आयोगासमोर मांडले. ५५ हजार कोटीचे कर्ज फिटल्यानंतर वीज दर कमी करु असे वीज मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी वीज ग्राहकांच्या माथी मारणार काय? असेही मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीत विचारले. वसईत लोकांना भरमसाठ बिले आली असल्याचे सांगत सदोष वीज मीटरमुळे बिले अधिक आली आहेत असे १० लाख वीज मीटर सदोष आढळले आहेत. रोलॅक्स कंपनीचे सदोष मीटर कुणी घेतले त्याची चौकशी व्हावी. रोलॅक्सची २९ कोटीची बँक गॅरंटी जप्त करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदोष यंत्रणा यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. महावितरण स्टॅण्डर्ड आॅफ परफॉर्म्स पाळत नाही. महाग वीजेमुळे उद्योग गुजरात वा अन्य राज्यात गेले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असे वसई वीज ग्राहक संघटनेचे जॉन परेरा यांनी सुनावणीत म्हटले. (प्रतिनिधी)>या दरवाढीस विरोध करणारे ४६६ अर्ज दाखल झाले होते. या सुनावणीस वसईतून जनता दल (से.), निर्भय जन मंच, वसई वीज ग्राहक संघटना असे तीन अर्ज दाखल झाले होते.पालघर, बोईसर, नवी मुंबई, सातारा, ठाणे असे राज्यभरातून अर्ज दाखल झाले होते आणि सुनावणीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.