शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

महावितरणाच्या दरवाढीस वसईत विरोध

By admin | Updated: August 4, 2016 02:39 IST

राज्यात वीज दर ३५ ते ५० टक्के असताना महाराष्ट्र राज्यात आधीच जास्त असलेले वीज दर आणखीन वाढवण्याची मागणी ग्राहकांना लुटणारी असून महावितरण कंपनीस वाढ मुळीच देऊ नये

वसई : अन्य राज्यात वीज दर ३५ ते ५० टक्के असताना महाराष्ट्र राज्यात आधीच जास्त असलेले वीज दर आणखीन वाढवण्याची मागणी ग्राहकांना लुटणारी असून महावितरण कंपनीस वाढ मुळीच देऊ नये अशी मागणी प्रदेश जनता दलाचे नेते व राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आणि महासचिव मनवेल तुस्कानो यांनी वीज नियमाक आयोगासमोर सुनावणीत बोलताना केली. अन्य राज्यातील वीज दराच्या पातळीवर येईपर्यंत वीज दर कमी करावेत (१०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर कमी करावेत) अशीही मागणी त्यांनी केली. महावितरणे ५६३७२ कोटी रुपये दरवाढीसाठी वीज नियमाक आयोगासमोर पिटीशन दाखल केला आहे. त्याची सुनावणी नेरुळ येथे तीन न्यायमुर्तींसमोर झाली. यावेळी मनवेल तुस्कानो यांनी भ्रष्टाचार, गलथान कारभार, वीज गळती, वीज चोरी, थकबाकीदार यांच्यामुळे आलेली तुट भरुन काढण्यासाठी सर्व ग्राहकांवर वीज दरवाढ करु नये, देशात समान वीज दर असावेत, मुंबईत तीन वितरण कंपन्या आहेत, त्यांचे दर कमी मग राज्यात जास्त कसे असे मुद्दे आयोगासमोर मांडले. ५५ हजार कोटीचे कर्ज फिटल्यानंतर वीज दर कमी करु असे वीज मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी वीज ग्राहकांच्या माथी मारणार काय? असेही मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीत विचारले. वसईत लोकांना भरमसाठ बिले आली असल्याचे सांगत सदोष वीज मीटरमुळे बिले अधिक आली आहेत असे १० लाख वीज मीटर सदोष आढळले आहेत. रोलॅक्स कंपनीचे सदोष मीटर कुणी घेतले त्याची चौकशी व्हावी. रोलॅक्सची २९ कोटीची बँक गॅरंटी जप्त करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदोष यंत्रणा यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. महावितरण स्टॅण्डर्ड आॅफ परफॉर्म्स पाळत नाही. महाग वीजेमुळे उद्योग गुजरात वा अन्य राज्यात गेले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असे वसई वीज ग्राहक संघटनेचे जॉन परेरा यांनी सुनावणीत म्हटले. (प्रतिनिधी)>या दरवाढीस विरोध करणारे ४६६ अर्ज दाखल झाले होते. या सुनावणीस वसईतून जनता दल (से.), निर्भय जन मंच, वसई वीज ग्राहक संघटना असे तीन अर्ज दाखल झाले होते.पालघर, बोईसर, नवी मुंबई, सातारा, ठाणे असे राज्यभरातून अर्ज दाखल झाले होते आणि सुनावणीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.