शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

विभाजनास संमेलनाध्यक्षांचा विरोध

By admin | Updated: April 10, 2016 02:56 IST

विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो, असे प्रतिपादन

धुळे : विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे. शनिवारी येथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात सबनीस यांनी महाराष्ट्राच्या विभाजनास विरोध असल्याची भूमिका घेतली.हल्ली सर्वच राजकीय पक्षांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण तयार झाले आहे. माझ्या भूमिकेकडे देवेंद्र फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, असेही सबनीस म्हणाले. खान्देशवासीयांना अद्याप कणखर नेतृत्व न मिळाल्याने त्यांना अन्यायच सहन करावा लागला आहे. खान्देशच्या विकासासाठी येथील मातीतीलच मुख्यमंत्री हवा. माजी मंत्री रोहिदास पाटील यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात मुख्यमंत्रिपद मिळाले तर ते चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात, असे मत सबनीस यांनी मांडले. मात्र, संधी मिळून त्यांनी त्याचा चांगला उपयोग केला नाही, तर याच सभागृहात येऊन त्यांचा मी निषेध नोंदवील, असेही ते म्हणाले.सबनीस यांनी आ. कुणाल पाटील यांनाही चांगले राजकारण करण्याचा कानमंत्र दिला. सबनीस यांनी अहिराणी भाषेत भाषणाची सुरुवात केली. परंतु, त्यांना या काही ओळी जगदीश देवपूरकर यांनी लिहून दिल्याचे ते म्हणाले. पुढाऱ्यांसारखे खोटे बोलता येत नसल्याचे सांगून इमानदारीने मत मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)सहावे अधिवेशन चाळीसगावलाचाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांनी सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन चाळीसगाव येथे घेण्याची घोषणा केली. खान्देश विकास प्रतिष्ठानतर्फे शनिवारपासून दोन दिवसीय संमेलनाला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमास रसिक वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.