शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिकेची आर्थिक स्वायत्तता केंद्राकडे देण्यास विरोध

By admin | Updated: August 29, 2016 06:03 IST

पालिकांची आर्थिक स्वायत्तता केंद्र सरकारच्या हाती देण्यास मनसेचा विरोध असून, त्याला सर्वपक्षीय आमदारांनीही विरोध करावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

ठाणे : पालिकांची आर्थिक स्वायत्तता केंद्र सरकारच्या हाती देण्यास मनसेचा विरोध असून, त्याला सर्वपक्षीय आमदारांनीही विरोध करावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. नव्या प्रणालीमुळे केंद्राकडून वेळेत पैसे आले नाहीत, तर शहरातील मोठ्या महापालिका कोलमडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.भाजपा महाराष्ट्रातील शहरांचे महत्त्व कमी करू पाहत असल्याचे सांगताना त्यांनी मुंबईतील एअर इंडिया कार्यालयाच्या दिल्लीतील स्थलांतराचे उदाहरण दिले आणि त्याची काय गरज होती, असा प्रश्न विचारला.गुजराती मतांवर डोळा ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातीतून टिष्ट्वट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने आणखी कोणाकोणाचे लाड होतील, ते सांगता येत नसल्याचा तिरकस टोला त्यांनी लगावला.इतर राज्यांचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे पाण्यासाठी काम करतात, त्याप्रमाणे फडणवीस काम करीत नसल्याचे सांगत त्यांनी त्यांच्यावर टीका केली.पंतप्रधानपदावरून बोलताना मोदींनी दलितांच्या आधी मला गोळ्या घाला, असे आवाहन केले की ते भावनिक आणि मी गोविंदांची बाजू घेतली की, त्यात राजकारण शोधण्याच्या मीडियाच्या प्रवृत्तीवरही त्यांनी आगपाखड केली.पेपर नव्हे, चॉपर आगे बढो म्हणतात, पण राज ठाकरे कपडे सांभाळत नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मुखपत्रातून केली होती. त्याला उत्तर देताना, मी कपडे सांभाळतो आणि ते परतही करतो. तुमच्यासारखे उघडे पाठवत नाही, असे राज म्हणाले. राणेंना मध्येच झटका येतो, तसे ते बोलतात. त्यांचा पेपर नाही चॉपर आहे, अशी मल्लीनाथी त्यांनी केली. (प्रतिनिधी)नऊ थर सलामीपुरतेचसर्वोच्च न्यायालयाने थर आणि उंचीबाबत दिलेल्या आदेशांचा भंग केल्याने मनसेचे आयोजक आणि गोविंदा पथकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने ठाकरे त्यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांनी त्याचा इन्कार केला आणि जीएसटी प्रणाली महत्त्वाची असल्याचा दावा केला. मनसे गोविंदा पथकांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या मंडळांनी नऊ थर लावले, ते त्यांनी सलामीपुरतेच लावल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्यक्षात हंड्या २० फूट उंचीच्याच होत्या आणि त्या तशाच फोडल्याचे सांगत त्यांनी आदेशाचा भंग झाला नसल्याचा दावा केला. न्यायालयांनी चौकट तोडू नयेदहीहंडीवर इतकी चर्चा झाली की, तिचा आता वीट आला आहे. थर लावणारे सराव करून थर लावतात. त्यामुळे न्यायालयांनीही सणांवर-उत्सवांवर मतप्रदर्शन करू नये. निकाल द्यावा. आपली चौकट मोडू नये. खुर्चीत बसून त्यांनी राजकारण्यांप्रमाणे प्रतिक्रिया देऊ नये. या मतांचा निकालाशी काही संबंध असतो का, असाही सवाल त्यांनी केला.मंडळांना आचारसंहिता : गणेशोत्सव मंडळे असोत की दहीहंडीची, त्यांच्याकडून दणदणाटाचा, सणांच्या पावित्र्यभंगाचा अतिरेक होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. यासाठी कोर्टात जाण्यापेक्षा राज्य सरकारने त्यांच्यासाठी आचारसंहिता आखून दिली पाहिजे. तसेच सध्याचे उत्सवांचे-सणांचे बाजारीकरण रोखले पाहिजे. मंडळांशी बोलून हा विषय संपू शकतो, असे सांगत त्यांनी न्यायालयात जाण्याच्या प्रवृत्तीवरही टीका केली.चारच्या पॅनलला विरोधपुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या १० महापालिकांच्या निवडणुकांत चार प्रभागांच्या पॅनल पद्धतीला मनसेचा विरोध असेल, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. दोन प्रभागांच्या प्रणालीत एक नगरसेवक दुसऱ्याला काम करू देत नाही. मग, चारच्या पॅनल प्रणालीत काय होईल, हे सांगायला नको, अशी टीका करताना मतदारांना कशाला त्रास देता, असा प्रश्न त्यांनी केला. समजा, दोन आमदारांचे मतदारसंघ एक करायचे झाले, तर काय होईल हे सांगा, अशा शब्दांत या निर्णयाची खिल्ली उडवत काँग्रेसपाठोपाठ भाजपाही शहराचे वाटोळे करण्यास निघाल्याचा आरोप त्यांनी केला.