शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी-दिल्ली कॉरिडोरला सरावली येथील सभेत विरोध

By admin | Updated: February 27, 2017 03:11 IST

बागायतदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीतून नेऊन त्यांना विस्थापित करण्याच्या रेल्वेच्या धोरणाला बागायतदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

शौकत शेख,डहाणू- पश्चिम रेल्वेच्या वाणगाव, डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या हजारो एकर सरकारी जागेतून सरळ मार्गाने रेल्वे न नेता ती पूर्वेकडील गावांतून तब्बल दोन कि.मी. अंतरावरील शेकडो बागायतदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीतून नेऊन त्यांना विस्थापित करण्याच्या रेल्वेच्या धोरणाला बागायतदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. जेएनपीटी - दिल्ली या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांना कोणताही मोबादला न देता सरकार आणि रेल्वे प्रशासन मनमानी पद्धतीने जमिनी देण्याची सक्ती करीत आहे. त्याविरूद्ध प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रविवारी सरावली येथे रेल्वे कॉरीडोअर विरोधी समिती स्थापन केली. काही बागायतदारांनी एक संयुक्त सभा घेऊन या विरोधात न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.डहाणू ते घोलवड दरम्यान अल्प भूधारकांच्या जमिनी असून सरकारने त्यांना कवडीमोल मोबदला देण्याचे धोरण ठरवल्याने त्याविरोधात शेतकरी पेटून उठले आहेत. आम्हाला पुरेशा प्रमाणात जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकरी, बागायदार, ग्रामस्थांनी घेतली आहे. येथील मोठ मोठ्या बागायत वाडीतून ही रेल्वे जाणार असल्याने या वाड्यांचे दोन ते चार भाग होणार असून त्याविरोधात रिट पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश गांधी , डहाणूचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, कॉरीडोर विरोधी समितीचे रवि फाटक, धनसुख माच्छी, विष्णू माच्छी, वेस्ता माच्छी यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.